दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
इतरांच्या बदल चांगलं बोलण्यासाठी प्रयत्न खुप करावे लागतात. परंतु इतरांच्या बद्दल अशोभनीय भाषा तोंडुन सहज निघते . अगदी प्रयत्न केले तरी हि कळत न कळत आपण इतरांच्या बदल काहीतरी बोलून जातोच हा एक सर्वसाधारण सवयी चा भाग म्हटलं तरी चालेल.खुप कमी अपवादात्मक लोक या सवयींपासून स्वतः ला अलिप्त ठेवण्यात यशस्वी होत असतात .तसं या सवयी पासुन स्वतःला दुर ठेवणं वाटत तितकं सहज सोपं नसतं. करणं समाज व्यवस्था आणि आपण मिळुन सगळेच अशा युगात वावरतोय जिथ स्वतः ला वगळता इतर बदल च मत स्थिर नसुन ते वारंवार आणि परस्थिती नुसार बदलत असतं आणि म्हणून याच दरम्यान वापरण्यात येणारी भाषा खुप महत्वाची असते . दरम्यान आपल्या भाषेवरून त्या शब्दावरून किंवा इतरांच्या बदल आपलं काय मत आहे. त्यावरून आपलं मुल्यमापन ठरत असतं .मोठं होणयाच स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या मध्ये काही दुमत नाही किंवा कहीच गैर नाही. परंतु इतरांच्या बाबातीत अवहेलना आत्मक चर्चा केलेल्याने किंवा अन आदरणीय उदगार काढल्याने आपण मोठे आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्या सोबत जो व्यक्ती आहे जो समुह आहे त्यांना छेटेपणाची जाणीव होऊ न देणे म्हणजे आपण खरया अर्थाने मोठे आहेत . आपल्या सोबत असणार्याला जर छोटेपणाची जाणीव झाली. तर मग मात्र आपल्या मोठेपणाला फार किंमत नाही .मोठं होण्यासाठी प्रयत्न करणं अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करण हा अंत्यंत योग्य मार्ग आहे परंतु . हल्ली एक नवीन प्रथा परंपरा आपल्यला पाहायला मिळत आहे. आपण कोणा बदल बोलतोय आणि काय बोलतोय कशासाठी बोलतोय याचा नेमका आणि योग्य अर्थ बोलणाराला माहित नाही .हे अतिशयोक्ती नाही तर वास्तव आहे . वाणी आणि पाणी हे अगदी जपून वापरले पाहिजेत असे आपले धर्म संस्कार आणि धर्म शास्त्रानुसार सांगितले आहे. पण आपण नेमकं सध्या या मुख्य विचारांना बगल देऊन आचरण करतोय वागतोय .आपण इतरांच्या संदर्भात काय बोलतो याला खुप महत्व असतं . प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष आपण इतरांच्या संदर्भात अन आदरणीय बोलण्याने आपला मोठेपणा सिद्ध होत नाही . आणि या पद्धतीने तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सुद्धा वेडेपणा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या पेक्षा सर्व बाबतीत वरचढ श्रेष्ठ व्यक्तिमत्वा बदल किंवा आपल्या पेक्षा लहान सर्वच बाबतीत कनिष्ठ असणार्या बदल अन् आदरणीय उदगार काढल्याने आपण खूप ज्ञानी आहेत महान आहेत किंवा श्रेष्ठ आहेत असं अजिबात होत नाही .कारण आपला मोठेपणा हा आपल्या वाणीतून प्रकट होत नाही तर तो कृतीतून आणि कर्तुत्वातून प्रकट होतो . शेवटी बोलणं आणि कृती करणं यामध्ये जमिन असमानच अंतर असतं . सुसंकृत बोलणं आणि टिंगल टवाळी म्हणून बोलण यामध्ये सुद्धा फरक असतो . सुसंस्कृत बोलणारा व्यक्ति कधीच चुकुन सुद्धा कोणाबद्दल टिका टिप्पणी करणारं नाही. किंवा अशा संवादात चर्चात सहभागी होणार नाही .जेवढं शक्य असेल तेवढे इतरांच्या संदर्भात त्याच्या तोंडून गौरव उदगार च निघाणर हे सुसंकृत व्यक्तिमत्वच मुख्य लक्षण आहे.आणी जो व्यक्ती इतरांच्या संदर्भात नेहमी सदैव अन् आदरणीय उदगार काढतो .महणजो तो ज्याच्या बदल उदगार काढले त्याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असं होतं नाही . म्हणून आपल्या पेक्षा कोणी लहान असो वा मोठं असो आपल्या शब्दांनी इतरांच्या सकारात्मक उर्जा निर्माण होऊन मनात स्नेह भाव आदर, आनंद हर्ष निर्माण झालं पाहिजे .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301