दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि -कवी सरकार इंगळी
पट्टण कडोली हे चाळी हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहरात सर्वत्रच घाणीचे सामराज्य पसरले होते.त्यामुळे गावात जागोजागी दुर्गंधी मुळे नागरीकांना त्रास होत होता.
पटृटण कोडोली येथील प्रसिद्द विठ्ठल बिरदेव प्रसिद्ध असणाऱ्या मंदिराकडे जाणारे रस्त्यावरच्या दोन्ही बाजूला भाजी मार्केट आहे.त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा असायचा.शिवाय गाव मोठे असलेने व्यापर लाईन भरपूर आहे. होलसेल किराणा दुकान,कापडाचे व्यापारी,हाॅटेल,पानटपरी,तसेच छोटे मोठे व्यवसाय यामुळे अनेक ठिकाणी पालेभाज्यांचा कचरा,प्लॅस्टीक पिशव्या,शितपेयाचे,पाण्याचे बाॅट्लस, पावसाने गटारी भरलेने असे कचरा साहित्य गटारीत तुंबलेने बरेच दिवस झालेने सर्वत्र दुर्गंधी सुटली होती.
मिडीयाच्या माध्यमातून हा कचरा प्रश्न जनते समोर आला होता.
पटृटण कोडोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णात महसूरकर यांनी आपले कार्यकर्ते सह जेसीबी व टॅक्टरच्या सहायने गावातील सर्व कचरा उठाव केला.आणि सामाजिक, सेवेचा एक आदर्श ठेवण्याचे कार्य केले आहे.
कृष्णात महसूरकर यांनी पाच सहा वर्षापासून सामाजिक,, शैक्षणिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांनी पुष्पादेवी महसूरकर फौंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम,रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक, कार्य जोपासले आहे.
त्यांनी गावातील सर्व कचरा उठाव मोहीम हाती घेऊन त्यांनी कचरामुक्त गाव केलेने त्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.