दैनिक चालु वार्ता परतुर प्रतिनिधी
येणारा जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिली असता शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अभ्यास बघता मनात एक वेगळा आनंद निर्माण झाला, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक येनोरा श्री शिवाजीराव गाडेकर सर यांची संपूर्ण टीम,श्री आसाराम नानासाहेब जोगडे,श्री देवदास नत्थुजी सोनवाने,श्री रविंद्र आबासाहेब लिपने,श्रीमती वैशाली हरिभाऊ यादव,श्रीमती शरयु चंद्रशेखर वाकोडे, या सर्व शिक्षकांचे शिक्षणाच्या बाबतीत आदर्श काम चालु आहे,या शाळेत सहज विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले समोरच्या बेंचवर बसलेला विद्यार्थी आणि मागच्या बेंचवर बसलेला विद्यार्थी या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये समांतर आढळून आले, या शाळेत सेमी इंग्लिश शिकवली जाते, विद्यार्थ्यांचा पाठांतर लिखाण अभ्यास बघितल्यानंतर हे विद्यार्थी इंग्लिश मेडियमचे आहेत का असा प्रश्न मनात निर्माण होतो, म्हणून मनात विद्यार्थी आणि शिक्षकांबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली, म्हणून प्रत्येक गावात गावकऱ्यांनी पुढाऱ्यांनी लक्ष घातले तर आपल्याच गावात इंग्रजी शाळेपेक्षा चांगले शिक्षण गाव पातळीवर आपल्याच गावात पाल्यांना मुला बाळांना शिक्षण मिळू शकते, दुसरी गोष्ट म्हणजे गावात शिक्षण घेण्याचे फायदे, शहरात राहण्यासाठी खर्च करायची गरज नाही, इंग्रजी शाळेचे मनमानी डोनेशन म्हणून द्यायची गरज नाही, घरातील काही व्यक्ती या शहरात शिक्षणा घेण्यासाठी घरातील काही व्यक्ती गुतुन जातात, म्हणून या गोष्टीवर लक्ष दिले तर आपला यामुळे पैसा वाचतो मुलांचे चांगले शिक्षण होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळेच्या अंगणात वृक्ष लागवड करून, श्री मुख्याध्यापक गाडेकर सर यांचे स्वागत करून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक खेड्यातील शाळांना सदिच्छा भेट देत आहोत, भेट देण्याची कारण जिल्हा परिषद शाळा खेड्यात शिकवत नाहीत असा संदेश लोकांमध्ये गेल्यामुळे प्रत्यक्षात परिस्थिती कशी आहे हे बघण्यासाठी पहिल्या टप्प्यात परतुर तालुक्यातील प्रत्येक शाळेला सदिच्छा भेट देऊन वृक्ष लागवड करणार आहोत, सदिच्छा भेट दौऱ्या अंतर्गत पाटोदा (माव) या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता या शाळेची सुद्धा शैक्षणिक परिस्थिती चांगली आहे, नाव जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता, असे लक्षात आले शिक्षक कमी आहेत म्हणून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, परंतु गावातील लोकांचे लक्ष शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत नाही असे आढळून आले, विद्यार्थी संख्या ७४ आहे, परंतु दोन शिक्षिका आहेत, वर्ग खोल्या दोन आहेत, पहिली,दुसरी,तिसरी, एका वर्गामध्ये, चौथी,पाचवी एका वर्गामध्ये, एकाच वर्गात सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात म्हणून त्यांच्या अभ्यास लक्षात येत नाही असे आम्हाला वाटले, गावातील माव गावातील शाळेच्या परिसर अस्वच्छ दिसुन आली, मुलांचे आधार अपडेट होत नाही म्हणून विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे म्हणून शिक्षकांची नेमणूक होत नाही,या शाळेची दुसरी इमारत वाफरात नाही मोडकळीस आलेली आहे त्या इमारतीचा विद्यार्थ्यांच्या जीवितवास धोका आहे, म्हणून ही जुनी शाळा प्रशासनाने लक्ष घालून त्यात दोन वर्ग खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन वर्गासाठी नवीन खोल्याचे बांधकाम झाले पाहिजे अशी मागणी मुख्या कार्यकारी अधिकारी जालना यांच्याकडे करणार आहोत, माव शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले, सदिच्छा दौऱ्यात सोबत राम नवल उपजिल्हाध्यक्ष जालना, ज्ञानेश्वर केवारे मनविसे जिल्हाध्यक्ष जालना,त्या त्या गावातील गावकरी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…