दैनिक चालू वार्ता वार्ता परभणी प्रतिनिधी-
मागील काही दिवसांपासून राज्यात गद्दार आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या संगतीने सुरु केलेले बदनामीचे हे कारस्थान वातावरण दूषित करण्यासाठीच असल्याचं परभणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी सांगितले.
ते पुढे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उद्देशून असेही म्हणाले की,
पक्षविरोधी कारवाया आणि नियमबाह्य सरकार स्थापन करुन बंडखोरांनी जी यंत्रणा राबवण्याचं प्रयत्न चालविले आहेत, आहे, त्याला रोखण्याचं व कडवा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य शिवसैनिकांमध्ये पूरेपूर असून तो त्यासाठी सज्ज आहे परंतु रस्त्यावर उतरलेल्या संतप्त शिवसैनिकांचा अनावर झालेला रोष पहाता कमालीचा रक्तपात होईल, महाराष्ट्र राज्यातलं वातावरण दूषित होईल या भीतीने शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे, थोपवून धरलं आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक शांत आहे.
दरम्यान या प्रकरणी चालू असलेली आपली न्यायालयीन लढाई सुरुच राहणार आहे. २० तारखेला निर्णय लागेल अशी अपेक्षा होती परंतु ते आता पुढे ढकलल्या चे कळतंय. गद्दार विरोधक स्टेटस्को मिळाल्याचं सांगत असले तरी न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. विरोधकांनी शिवसैनिकांना कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यात यश येणार नाही. न्यायालयीन लढाईला अधिक बळकटी मिळावी म्हणून परभणी शिवसेनेतर्फे शपथपत्र मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या कार्यालयात जिल्हाभरातील शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनी शपथपत्र भरुन देण्यासाठी स्वत:हून मोठी गर्दी केली आहे.
याठिकाणी शिवसेनेचे विधानसभेचे संपर्कप्रमुख प्रमुख जगदीश चौधरी हे सुध्दा आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्यांचेही अभिनंदन व्यक्त करुन आम्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ६०० तर शिवसैनिकांचे ५००० असे मिळून ५६०० शपथपत्र सर्वात अगोदर आमचे दैवत-मंदीर सेना भवनात पाठवून देणार आहोत असेही डॉ. नावंदर यांनी सांगितले.