दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -सलमान नसीम अत्तार
धाड सर्कल
गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत गावात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे.
गावातील बस्टॅन्ड परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता गावातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे.
या सट्टा पट्टीच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. गावात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. धाड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष
पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी पंचायत समेती उप सभापती , ग्राम पंचायत सदस्य,माजी सरपंच यांनी बस्टेन्स्ड परिसरातील या अवैध धंदे बंद करण्या साठी निवेदनात मागणी केली आहे .
बस्टॅन्ड परिसर हे गावातला मुख्य रस्ता आहे येथून कॉलेज, शाळेत व शेतात जाणाऱ्या मुली व महिलांना नेहमी त्रास सहन करावा लागतात. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या महिलांना बस्टॅन्ड मध्ये बसायला जागाच नसतात कारण दारुड्या व नशेडीनि तिथे आधीच तळ ठोकून बसले असतात.
त्यामुळे गावातील व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थानी बुलढाना पोलीस अध्यक्ष कार्यालयात निवेदन देऊन केली आहे. तसेच हे अवैध धंदे बंद ना झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असं इशारा ही देण्यात आला आहे. अवैध धंदे बंद करून अवैध धंदे चालवीणाऱ्या माफियावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर सरपंच सुनील महेर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश धनावत,पोलीस पाटील पंकज देशमूख, माजी पंचायत समेती उपसभापती भानुदास राऊत, माजी सरपंच दिलीप उसारे,ग्रामपंचायत सदस्य भरत पाकल, आत्माराम सोनोने,कैलास मोरे यांच्या सह्या आहेत.