दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा:-आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा सुभाषनगर येथे सांडपाण्यामुळे रस्त्याच्या जागोजागी साचलेल्या दूषित पाण्याच्या डबक्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत,कोरोनाने आजाराने सर्वत्र थैमान घातलेले असताना,जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छतेचा जागर होत असताना,अशातच हिवाळ्याचे दिवस आले असल्याने सर्वत्र रस्त्यावर डबके साचले आहेत, या साचलेल्या दूषित पाण्याच्या डबक्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, यावर उपाययोजना करण्याची मागणी सुभाषनगर येथील नागरिकाकडून ग्रामपंचायत प्रशासनाला किली आहेत, सुभाषनगर येथील दाट लोकवस्ती असलेल्या भागात हिवाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र रस्त्यावर डबके साचले आहेत, यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे,साचलेल्या डबक्यामुळे डेंगू,मलेरिया,डायरिया यासारखे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे,गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले दिसून येत असून,त्यात कोरोनासारख्या वैश्विक महामारीचे सावट अजून उभेच आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्याचे हित लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सुभाषनगर ग्रामवासीयाकडून केली जात आहे