दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
तूच शक्ती तूच माता ,तूच या जगाची उद्धारकर्ती, तूच रणरागिनी तूच रमाई, तूच सावित्रा तूच मुक्ताई अशा वेगवेगळ्या नावांनी ओळख तुझी तुझ्यामुळेच हे सर्व विश्व अशा या जगामध्ये ओळख निर्माण करून देणाऱ्या सर्व माता माऊलींना मानाचा मुजरा.
महाराणी ताराबाई (1675..1761 ) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म 14 एप्रिल 1675 रोजी झाला महाराणी ताराबाई चे लग्न छत्रपती राजाराम महाराजांची 1680 च्या सुमारास झाले कारण त्या काळामध्ये पाळण्यामध्येच लग्न करण्याची प्रथा होती तशा ताराराणी अगदी पाच वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह झाला.
25 मार्च 1689 रोजी मोगलांशी रायगडास वेडा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून जिंजीस गेल्या छत्रपती राजाराम महाराज जिंजीस आल्यानंतर महाराणी ताराबाई ,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे ठेवले रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४साली त्या तिघी जिंजीला पोचल्या 9 जून 1696 रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
पुढे राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे महाराणी ताराबाई यांच्या हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगाशी खचून न जाता अगदी रणरागिणी प्रमाणे या जुलमी मोगली फोजांना नामशेष करण्यासाठी महाराणी ताराराणी यांनी खूप आक्रमक भूमिका घेतली .लष्कराचा आत्मविश्वास वाढवला आपल्या या बुद्धी चातुर्याच्या जोरावर अनेक वर्ष मोघलांचा कर्दनकाळ म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा एक धाक निर्माण केला मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडवले. मोगली मुलखावर स्वाऱ्या करून त्यांच्याशी युद्ध करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करणारी व आपली आर्थिक बाजू बळकट करून आपल्या सैन्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ही दुर्गा सर्वांना आपल्या धाडसाने सर्व मोगली सत्तांना त्यांच्या कार्याची धडकी भरली.
कालांतराने कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली महाराणी ताराबाई साहेब मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार स्त्री बनल्या .शत्रुराष्ट्रांशी युद्ध करून आपल्या राज्याची धुरा अविरतपणे सांभाळली सरसेनापती संताजी व धनाजी यांना बरोबर घेऊन मोघलांना दिवसाही व रात्रीही संताजी व धनाजी च्या ताकदीची भीती बसू लागली असे हे कर्तबगार सरसेनापती महाराणी ताराबाई यांच्या कार्यामध्ये अगदी विश्वासाने कार्य करू लागले त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्तुत्वान स्त्रिया मधील एक अभिमानाची व गौरवाने नाव घ्यावे असे कर्तृत्व म्हणजे महाराणी ताराबाई. जेव्हा मराठी सत्ता खूप अडचणीमध्ये होती तेव्हा या माऊलीने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर व आपल्या बुद्धीच्या बळावर माणसे कमवली आणि विश्वास कमवला आणि त्यांच्या ताकतीच्या जोरावर त्या जुलमी मोघलांशी निकराने लढा देऊ शकल्या अशा सर्व सेनापती सरदार व कायमस्वरूपी पाठीची ढाल जशी संरक्षण करते तशी या सैनिकांनी ढाल म्हणून ताराबाईच्या पाठीशी सदैव राहिले .ज्या मोगल बादशाह औरंगजेबासारख्या मुत्सद्दी ताकतवान शत्रुराष्ट्रावर भारी पडणाऱ्या औरंगजेबाला या 24 ते 25 वर्षाची एक स्त्री सलग साडेसात वर्ष लढा देते व त्या लढ्यामध्ये पराजित होत नाही व ज्या औरंगजेबाचे सर्व मनसुबे मातीत मिसळले ज्या महाराष्ट्राला नामशेष करण्याचा चंग बांधणाऱ्या औरंगजेबाला एक स्त्री म्हणून झुलवत ठेवते अशा या रणरागिनीस आम्हा सर्व भारतीयांना गर्व व अभिमान आहे.
लेखक
श्री विक्रम बलभीमराव पाचंगे प्राथमिक पदवीधर जि प प्रा शा मानमोडी जिल्हा उस्मानाबाद.