दै चालु वार्ता वृत्तसेवा
जळगाव : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जळगावात भाजपचा 1 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात धडक मोर्चा काढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, आर्यन खान व समीर वानखेडे प्रकरण, नवाब मलिकांचे आरोप अशा विषयांवर गिरीश महाजन यांनी टीका केली. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर थेट टीका केली आहे. स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलचे नेते समजत होते, तर निवडणुकीत का पडले याचे आत्मपरीक्षण खडसेंनी करावे, असे म्हणत महाजन यांनी खडसेंवर निशाणा केला आहे.ईडीच्या मुद्यावर बोलतानाही महाजन यांनी खडसेंना चिमटा घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काहीही केलेले नाही तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. ईडी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात काहीही तथ्य नसेल तर तुम्हाला ईडी वाजत गाजत परत पाठवेल, असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं.