दै.चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
रमेश राठोड
सावळी सदोबा:-आर्णि पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा निळेगांव (माळेगांव) या गावाला स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी समशानभूमी नाहीत,
सविस्तर वृत्त,आर्णि तालुक्यातील निळेगांव (माळेगांव)गट ग्रामपंचायत असून या गावाची लोकसंख्यादेश २००० च्या जवळपास असून,या गावात वर्ग १ ते ४ पर्यंत जिल्हा परिषद शाळा ही होती,एकेकाळी या गावातुन स्व.शेषेराव गांजरे सरपंच तर स्व.इब्राहिम खान घाटांजी पंचायत समितीचे सदस्य झाले होते,या गाव आदर्शगाव या नावाने सुद्घा परिसरात ओळखले जायचे,राजकीयदृष्ट्या गाव दुर्लक्षित असून,सदर गावांमध्ये नागरिकासाठी कोणत्याच मूलभूत सोयीसुविधा नाहीत,देश लवकरच स्वातंत्र्याची ७५ वी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना आर्णी तालुक्यातील निळेगांव गावाला अजूनही हक्काच्या मूलभूतसुविधेपासून वंचित आहे अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या ठिकाणी किंवा गावालगत असलेल्या नाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे, पावसाळ्यामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना नागरिकांना कसरत करावी लागते, जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह समस्या मिनिट अंत्यसंस्कार पार पाडले जाते,मात्र निळेगाव येथे स्मशानभुभी नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे,त्यामुळे “स्मशानभूमी नाही गावाला गाव नुसते नावाला अशी म्हणण्याची वेळ निळेगांव गावाला आलेली आहे,स्वातंत्र्याची ७५ वर्षं उलटून सुद्धा उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे, आजतागायत गावकऱ्यांनी फक्त आश्वासने मिळाली आहे