शेकडो शेतकऱ्यांचे बँक खाती केली होल्ड–—
दै चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी:
सुशिल घायाळ
संकटात असलेल्या शेतकऱ्याला अल्पशी का होईना ठराविक कालखंडात मदत व्हावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेला मंठा एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्याकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
मंठा येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत शेतकऱ्यांचे खाते होल्ड ठेवत आहेत .कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची खाते होल्ड ठेवून वसुली केली जावी हे कारण पुढे करून बँका अधिकारी शेतकऱ्यांची खाते गोठवत आहेत. या शेतकऱ्याकडे जुनी थकबाकी असेल किंवा चालू बाकी असेल तरी त्या शेतकऱ्याचे त्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे पैसे पडत असतील तर ते खाते गोठवले जाऊ नये असा शेतकरी सन्मान योजनेचा नियम आहे. तरी या नियमांना पायदळी तुडवत बँक अधिकाऱ्याकडून सरसगट खाते होल्ड करत आहेत. यासंदर्भात अनेक शेतकरी यांचे कडे खाते गोठवल्या ची तक्रार मांडली. यानंतर बँका अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता मी कोणत्याही परिस्थितीत गोठवलेले खाते काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गोठवलेले ,होल्ड खाते काढण्याचे आदेश द्यावे . तहसीलदार यांनी बँक अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करावी.अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.