
दैनिक चालू वार्ता
उमरखेड प्रतिनिधी
सचिन मुगटकर
हदगांव : नुकतेच दोन महिन्या पूर्वी घडलेल्या घटनेचा विचार करता उमरखेड ते पुसद रस्त्यावरील दहागाव पुलावरून महापुराचे पाणी वाहत असतांना बस चालकास पुलाची दर्शनीय दिशा समजली नसल्यामळे बस पलटी होऊन चार जनांचा मृत्यू
झाल्याची दुर्दैवी घटना घडली
त्यामळे अशा दुर्देवी घटनांची
पुनरावृत्ती होऊ नये व प्रवाशी
वाहनांना सुरक्षीत प्रवास करता
.यावा यासाठी तालुकयातिल उपविभागातील सर्वच धोकादायक पुलांवर सिमेंट किंवा लोखंडी खांब उभे करावे अशी मागणी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ . विजयराव माने यांच्या नेतृत्वात उपविभागिय अधिका-यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे . याची त्वरीत
दखल घेऊन उपविभागिय अधिका-यांनी उपविभागिय अभियंत्याना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत . भविष्यात अपघात होऊन जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रशासनाने धोकादायक पूलांवर सिमेंट किंवा लोखंडी कठडे बसवून त्यावर रंगीबेरंगी पटटे मारल्यास वाहन चालकांना पुलाची दिशा समजेल व पाण्याची सुरक्षित पातळी समजेल या करीता भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. विजयराव माने यांच्या नेतृत्वात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी निवेदन दिले होते . त्या अनषंगाने उपविभागिय अभियंत्यांना नियमा नुसार योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत .