दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
। गणी गण गणात बोते । कालयुगाच्या प्रंरभी सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री दत्त यांनी नाथ संप्रदाय ची मुहूर्त मेढ असणारे नवनाथ यांना अनुग्रह देऊन जन्म आणि मरण यापलिकडे आत्मा आणि परमात्मा आहे. सृष्टी वर जन्म घेणार सर्व साधारण माणुस त्याच्या आयुष्यातील भव दुःख क्षीण करण्यासाठी नवनाथ भक्ति संप्रदाय निर्माण केला आणि पुढे आवश्यकतेनुसार अनेक संत महंत लोककल्याणासाठी धर्तीवर अवतारीत झाले त्यापैकी संत श्रेष्ठ गजानन महाराज .तसं पाहिलं तर देव-देवतांची भुमि म्हणून प्रसिद्ध आसणार्या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत जन्मास आले. ज्यामध्ये प्रामुख्याने जगद गुरू संत ज्ञानेश्वर महाराज, विश्व गुरू माहत्मा बसवेश्वर, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, राष्ट्र संत भगवानबाबा संत मन्मथ स्वामी तसेच अनेक भक्तांना यशाची प्रचिती आलेले अगाध लिला असणारे शेगावीचे संत श्री. गजानन महाराज. शेगाव ते पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघणारी भव्य अशी पायी दिंडी जाताना आणि परत येताना रस्त्याने दर्शनासाठी होणारी प्रत्येक ठिकाणची गर्दी संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या बाबत लोकांच्या मनात आजही किती श्रद्धा भाव आहे याची प्रचिती येते.तसेच पंढरपूर येथे असणारा भव्य दिव्य मठ व दैनंदिन तेथे येणारे भक्तगण येथिल व्यवस्था नियोजन, आणि सकारात्मक उर्जा गजानन महाराज आजही साक्षात आपल्या सोबत आहेत असंच जाणवतं.
गजानन महाराज यांचे अवतार कार्य प्रामुख्याने विदर्भात झाल्याचे दिसते .परंतु त्यांच्या भक्तीचा महिमा देशभरातील भक्ता मध्ये आज सुद्धा दिसून येतो. गजानन महाराज तसे तर महाराष्ट्रात पंढरपूर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती या भागाला त्यांनी आवर्जून भेटी दिल्या. काही दिवस त्यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीस गेले तेथे काही दिवस आश्रमी राहिले स्वामी समर्थ महाराज यांच्या सांगण्यावरुनच गजानन महाराज शेगावीस आले व भक्तांचा उद्धार करु लागले. झुणका-भाकर हे महाराजांचे आवडते खाद्य म्हणून आजही भक्तगण गुरुवार करत असतांना पिठलं-भाकरीचा नैवेद्य महाराजांना अर्पित करतात. तसेच झुणका भाकरी सोबतच पिठीसाखर, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या हे त्यांना आवडत असत. ‘गण गण गणात बोते’ हा महाराजांचा मंत्र होय.भक्तगण या मंत्रानेच महाराजांचा जप करतात.
महाराजांनी भक्तगणांना अशी शिकवण दिली की देव केवळ देवळात नाही तर सर्वत्र आहे. परमार्थात खोटेपणाला थारा नसतो. असे ते नेहमी म्हणत. सत्कर्म करणार्याचे नेहमी चांगलेच होते असे ते म्हणत. जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होण्यासाठी ईश्वर भक्ती गरजेचीच असे ते म्हणत. कित्येकांना तर त्यांच्या चमत्काराची प्रचिती आली ती अशी की बापूराव नावाचा महाराजांचा एक भक्त पंढरपुरी मुक्कामी होता पण त्याला भगवान विठोबाचे दर्शन झाले नाही तर गजानन महाराजांनी स्वतः विठोबाचे दर्शन दिले., भास्कर पाटील नावाच्या शेतकर्याला दुष्काळात शेतीसाठी त्रास होत होता हे जेंव्हा गजानन महाराजांना कळले तेंव्हा त्याच्या शेतातील विहिर ही तुंडूंब भरुन गेली. नर्मदेमध्ये बुडणारे जहाज गजानन महाराजांच्या आशिर्वादाने तरुन गेले.
पुढे गजानन महाराज यांच्या समक्ष 1908 मध्ये श्री गजानन महाराज संस्थान स्थापन झाले . गजानन महाराज संस्थानने भक्तांसाठी सोय म्हणून पुढे संस्थानचा जीर्णोद्धार केला.
श्री.गजानन महाराज यांच्या समक्षच 1909 साली मंदिर बांधकाम झाले पुढे या बांधकामात बदल होत गेले.. या मंदिराचे शिखर 51 फूट उंच आहे.. श्रीं चे दर्शन भुयारी मार्गाने होते पुढे विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. मंदिर परिसरातच एक औदुंबर वृक्ष आणि हनुमान देवताचे एक छोटेसे मंदिर आणि नागदेवतेचे मंदिर आहे. तसेच श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज ह्यांच्या समाधी याच ठिकाणी आहेत.
संत श्री.गजानन महाराज हे संस्थान एक आदर्श संस्थान आहे… गजानन मंदिर संस्थान शेगांव जि.बुलढाणा येथून भक्तांकरिता देण्यात येणार्या सेवा म्हणजे एखाद्या परिवारात एवढी काळजी माणसांची घेतली जात नसेल तेवढी काळजी आणि चांगल्या सेवा गजानन मंदिराच्या संस्थानाकडून देण्यात येतात. कोणत्याही व्यक्तीला बोलताना माऊली या शिवाय शब्द ऐकायला मिळत नाही. श्री गजानन महाराजांचे दर्शन तर अत्यंत शिस्तीत प्रत्येक भक्ताला मिळते कुठलीही गर्दी नाही ना कोणता गोंधळ. गजानन मंदिर शेगाव येथे जो कुणी भक्त एक रुपयापासून एक लाख रुपयापर्यंतची मदत करतो त्या भक्तांचा एकही रुपया कुठे व्यर्थ जात नाही कारण इथे भ्रष्टाचार नाही ना, कुठे व्यर्थ खर्च नाही, नियमानुसार तो पैसा खर्च केल्या जातो तो केवळ आणि केवळ भक्तांच्याच सेवा करिता मग त्यात भक्तांसाठी रुग्णालये, औषधालये, आदिवासींकरिता फिरते रुग्णालय आणि आदिवासींकरिता दिवाळीला मोफत कपडे वाटप या व्यतिरिक्त राज्यात पाच ठिकाणी आणि राज्याबाहेर एका ठिकाणी असे एकूण सहा ठिकाणी गजानन संस्थान शेगाव कडून भक्तांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात श्री क्षेत्र पंढरपूर येथे, श्री क्षेत्र आळंदी येथे, श्री. क्षेत्र त्रंबकेश्वर, पंपासरोवर जि.नाशिकजवळ येथे, गिरणा जि.बुलढाणा येथे आणि राज्याबाहेर मध्यप्रदेश येथे ओंकारेश्वर येथे अशा सहा ठिकाणी भक्तांसाठी राहण्यासाठी आणि जेवणासाठी अल्प दरात सेवा देण्यात येत आहेत. भक्तगणांसाठी उत्तम व्यवस्था… शिस्तीचे पालन आणि पारदर्शक कारभार म्हणून या संस्थानाची महाराष्ट्रात ख्याती आहे… कितीही गर्दी असू द्या हे संस्थान प्रत्येक भक्ताला दर्शन घेण्यास मदत करते… आणि हो देशाच्या कानाकोपर्यातून येथे भक्त येतात त्यांच्यासाठी निवासाची सोय म्हणून भक्तनिवास संकुल उभारलेले आहेत.या संस्थानामध्ये 10 हजारापेक्षा जास्त सेवेकरी आहेत… त्यामध्ये तरुण मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सेवेकरी आहेत… वर्षभर मंदिरात भजन किर्तनासारखे कार्यक्रम होतात… येथे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पुजा आरतीसारखे कार्य अविरत चालू असते.मनाल आनंद शांती देणारा हा परीसर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र नेत्र तृप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. एकंदरीत गजानन महाराज यांचे कार्य आणि महती हि थोर प्रचंड अगाध अशी आहे . ज्याची कल्पना करणं सुद्धा शक्य होणार नाही. सृष्टी वरील जन उदाराचे कार्य पुर्ण झाल्यानंतर या सृष्टीचा निरोप घेणं क्रमप्राप्त असतं .याला कोणिही अपवाद नाही.संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची कृपा आशिर्वाद भक्तांसाठी आजही तसेच आहेत .जो सुद्धा अंतःकरणाने भक्ती करेल त्याला आजही कृपा प्रसाद लाभतो .असे महान व संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम दंडवत
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ, महाराष्ट्र
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबिर, अध्यात्मिक मार्गदर्शक
मो.9011634301