दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जगातील सगळ्यात प्रचिन दुरदृष्टी असणारी व सर्व श्रेष्ठ अशी संस्कृती म्हणून आपल्या संस्कृती चा नाम उल्लेख केला जातो.आणि तो वास्तविक सत्य आहे. अनेक नानाविध गुण वैशिष्ट्याने नटलेली विविधतेत एकतेच प्रदर्शन घडविणारी अनेक सण उत्सवांची खाणं असणारी आपली संस्कृती व परंपरा व त्याचे आपण सगळे आजही अगदी मनोभावे धार्मिक पद्धतीने पालन करून सण उत्सव साजरे करतो .व या अविस्मरणीय क्षणात अ प्रतिम आनंद जो निर्माण होतो . त्याचे आपण सगळ्यांना भागिदार होण्याचं भाग्य लाभलं हाच आनंद खुप विशाल असतो. एकंदरीत आपले जे सर्व सण उत्सव साजरे करतो . त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आध्यत्मिक महत्व हे वेगवेगळे आहे .पण त्यामधील आनंद मात्र सारखाच आहे. आपल्या संस्कृती नुसार प्रत्येक सण उत्सवांचे स्वरूप व परंपरा हि वेगवेगळी असुन देशाच्या विविध भागात आप आपल्या प्रथेनुसार सर्व जण सण उत्सव साजरे करतात.या सर्व उत्सवाचे अलौकिक असे आध्यत्मिक महत्व आहे. अगदी अनेक वर्षापासून म्हणजे पुरातन काळापासून आपण व आपल्या पिढ्या न पिढ्या हे धार्मिक सण उत्सव अगदी उल्हासा मध्ये सर्व सुख दुःख,भेद ,भाव , कटुता,राग, द्वेष, विसरून अगदी आनंदात मग्न होऊन तलिन होऊन साजरे करतो . हेच भारतीय संस्कृतीच महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. एकदा गणपती बाप्पाचे आगमन झाले कि मग काय आनंदाला पारावार उरत नाही.आणि त्यामध्ये लगेच आगमन होते ते गौराईच आणि मग तर घरो घरी उत्सव काय ती लगबग काय तो आनंद काय तो उत्सव सगळं काही क्षणिक स्वर्ग सुख निर्माण करणारच. भौतिक सजावट किती सुंदर आणि आकर्षक करता येईल. यासाठी अखाडे अराखडे आणि बेत तर अ प्रतिमच आसतात. त्यातही गौराई या लक्ष्मीच्या पावलांनी येतात मग तर सगळं विलक्षणच भन्नाट . गौरीच्या स्वागताला अख्खं कुटुंब लहानथोर अगदी लगबगीने गौराईला आपल्याला घरात आणतात .मग सुरवात होते ती गौराई यांच्या सजावटीची ,सजावट , आकर्षक अभुषणे , वेगवेगळे साहित्य आणि धनधान्य राशी , विविध ,फळ, गौरवशाली गौराई समोर अगदी विलक्षण दृश्य ,मग गोराईच भोजन व्यवस्था आपल्या कडे साधारणतः तीन दिवस गौराई असतात पहिल्या दिवशी आगमन दुसर्या दिवशी भोजन , आणि तिस-या दिवसी मग आपण गौराईना आनंदाने निरोप देतो . आणि पुढच्या वर्षी येण्याचं निमंत्रण देतो .पहिला दिवस येण्याचा उत्सव दुसरया दिवशी मात्र सकाळी अगदी चाहपाणी नाष्टा , दुपारी अल्पउपहार, आणि संध्याकाळी मात्र भव्य दिव्य असा उत्सव म्हणजे भोजन सोहळा सगळ्या पद्धतीनचे मिष्टान्न , आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या राण भाज्या , ज्यामध्ये पंधरा सोळा प्रकारच्या राण भाज्या समाविष्ट असतात.आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फारळ साहित्य , करून अगदी पुजन करून दिप प्रज्वलन करून गौराईंची पुजा करून पंच पक्वान्न नैवेद्य , दाखवला जातो.दरम्यान गौराई यांच्या डोक्यावर हरळी ,आघाडा , याची पेंढी करून डोक्यावर ठेवली जाते .हे हरळी आघाडा अगदी दूर दुर शेतात फिरून शोधून आणावं लागतं.आणि मग आरती करून घरातील लहान थोर मंडळी भोजन गृहण करतात . तिस-या दिवशी घरोघरी गौरी पाहण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असते . मग अख्खा दिवस आणि मध्यरात्री पर्यंत गौराई दर्शन हा अ प्रतिम सोहळा साजरा केला जातो.आणि मग भक्ती भावाने आरती करून गौराई यांना निरोप दिला जातो. आपल्या संस्कृती नुसार एकता , मानवता, वृद्धिंगत करण्या बरोबरच आनंदी क्षणाची पर्वणी या निमित्ताने आपल्यला मिळते.आणि संस्कृती व प्रथा परंपरा ह्या किती मजबूत आहेत याच दर्शन यामधुन घडतं . अगदी गरीब ,श्रीमंत, लहान थोर प्रत्येकाच्या घरी गौरी गणपती असतात आणि मग प्रत्येक जण आप आपल्या ऐपतीप्रमाणे व्यवस्था करून गौरी गणपती यांचं आदर आतिथ्य करतो. आपल्या संस्कृती मधील हा विलक्षण आणि आनंदी क्षण असतो .आपण सगळेच दर वर्षी प्रमाणे याही वर्षी वाट पाहत असतो .तो क्षण आलेला आहे.आणि प्रत्येकाने या आनंदी पर्वाचा हिस्सा होऊन उत्सवातील आनंद द्विगुणित करयाचा आहे.
.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301