दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : तालुक्यातील पिंपरी (दे.) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज घेण्यात आली. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी जे संचालक मंडळ निवडून देणे आवश्यक असते, त्यासाठी आजची ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण व चुरशीची ठरली गेली.
बळीराजा परिवर्तन विकास पॅनेल व शेतकरी विकास पॅनेल या दोन विभिन्न बॅनरखाली प्रारंभी लढवली जाणारी निवडणुकीत अखेर मतांच्या विकेंद्रीकरणामुळे सत्तेपासून कोणालाही दूर फेकले जाऊ नये यासाठी हे दोन्ही पॅनेल सामोपचाराने का होईना परंतु एकत्र आले. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली गेलेली ही निवडणूक अखेर एकोप्याच्या समन्वयातूनच लढवली गेल्याचे समजते. येनकेन प्रकारे सत्तेची बागडोर समन्वयाने सांभाळता यावी म्हणून ऐनवेळेस झालेला एकोपा महत्वपूर्ण ठरल्याचे दिसून आले आहे. यासाठी परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव, शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील, कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व अन्य सहकारी पक्ष या सर्वांनी मिळून समन्वयातून काढलेला मार्ग अखेर फलदायी ठरल्याचे दिसून आले आहे.
विजयी झालेल्या उमेदवारांची नावे, त्यांचे पॅनल, मिळवलेली मते आणि मतदार संघ निहाय वर्गवारी पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. सर्वसाधारण कर्जदार गटातून रिंगणात उतरलेले आणेराव गंगाप्रसाद आबासाहेब हे बळीराजा परिवर्तन विकास पॅनेल मधून विजयी झालेले एकमेव उमेदवार आहेत. त्यांची निशानी ट्रॅक्टर ही होती. त्यांना एकूण ३९३ मते मिळाली आहेत तर पुढील सर्व उमेदवार शेतकरी विकास पॅनेलमधून विजयी झालेले आहेत.
आवकाळे नामदेव सोपानराव (३५६), आवकाळे रामचंद्र रंगनाथ (३८२), अवकाळे विक्रम माणिकराव (३६८), डुकरे संभाजी रामभाऊ (३७७), देशमुख वंदना शिवाजी (३७६), बंडेवार सतीश लक्ष्मण (३८६) व मुलगीच किशोर शिवाजी (३५४) हे सर्वजण सर्वसाधारण कर्जदार गटातून कपबशी या निशानीवर विजयी झाले आहेत. महिला राखीव मतदार संघातून देशमुख पुष्पाबाई त्र्यंबकराव (४०५) तर देशमुख मिनाताई प्रकाशराव (३९५) मते घेऊन विजयी झाल्या आहेत. इत्र मागास प्रवर्गातून दवणे प्रकाश शंकरराव (३७६), साधने श्यामू खंडू (३८४) हे अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून विजयी झाले आहेत. तर मात्रेत पंडित बालासाहेब हे वि.जा./भ.जा./वि.मा.प्र.मतदार संघातून (३८३) मते मिळवून विजयी झाले आहेत. हे सर्वजण शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार आहेत.
एकूण असलेल्या ८३६ मतदारांपैकी ५९७ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणूकीचे कामकाज एस. पी. बाशवेणी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांच्या नेतृत्वाखाली पार पाडले गेले आहे.