दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
वाई पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील कणुर या गावांमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारांस मूल होत नसल्याच्या नैराश्यांतुन कणूर येथील राजपुरे दांपत्याने गळफास घेवुन आपले जीवन संपविले या घटनेमुळे कणुर गावासह बावधन परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वाई पोलीस ठाण्याकडूंन मिळालेल्या माहितीवरुन कणुर (ता. वाई) येथील तानाजी लक्ष्मण राजपुरे (वय ४०) व सौ. पुजा तानाजी राजपुरे (वय ३५) यांचा सुमारे तेरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तेरा वर्षापासून मूलबाळ होत नव्हते यासाठी दोघेही औषध उपचार करीत होते. मात्र सततची पदरी पडणाऱ्या नैराशेला कंटाळून त्यांनी गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारांस राहत्या घरांमध्ये पत्र्याच्या खाली लोखंडी अँगलला साडीच्या साह्यांने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील सुरज जठार यांनी वाई पोलीस ठाण्यांत दिली. पुढील तपास पोलीस हवालदार के.एस मुजावर व के.एम आवळे करीत आहेत.