दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर– ता.अहमदपूर जि. लातूर येथील गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की,दिव्यांग व्यक्ती ( समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग ) अधिनियम 2019 95 मधील कलम 40 अन्वये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग कल्याण साठी पाच टक्के निधी राखून ठेवणे बाबत निर्देश दिलेले आहेत . सद्यस्थितीत केंद्र शासनाने दिव्यांग हक्क अधिनियम 2016 हा कायदा देशभर लागू केलेला आहे . सदर कायद्याची अंमलबजावणी दिनांक 19/ 4 /2017 पासून देशातील सर्व राज्यभरात करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचा 5% निधी दिव्या कल्याणासाठी राखून ठेवून विविध योजनांमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण ठेवणे बाबत निर्देश दिलेले आहेत , या अनुषंगाने नगरविकास विभागाचे दिनांक 19 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार व ग्रामविकास विभागाने दिनांक 25 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या अधिनिस्त स्थानिक स्वराज्य संस्थांना 5% निधी दिव्यांग कल्याणार्थ राखून ठेवून खर्च करणे बाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
असे असताना आपल्या कार्यक्षेत्रातील बहुतांश ग्रामपंचायत यांनी पाच टक्के निधी हा वापरलेला दिसून येत नाही ,मागील पाच पाच वर्षांपासून 5% टक्के निधी ग्रामपंचायत खर्च करीत नाहीत असे निर्देशनात आले आहे शासन निर्णय नुसार राखीव 5% निधी संपूर्ण खर्च करावा तरतूद आहे , तरी ग्रामपंचायत खर्च करीत नाहीत असे दिसून येत आहे. तरी प्रहार जनशक्ती पक्षाची आपणास विनंती आहे की, या निवेदनाची आपण तात्काळ दखल घेऊन निधी खर्च करावा, अहमदपूर तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत व मार्गदर्शन कसे देता येईल यावर लक्ष घालून शासनाच्या सर्व मुख्य योजनांमध्ये दिव्यांगांना लाभ देण्यात यावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष अहमदपूर तर्फे गटविकास अधिकारी कार्यालय ठिय्या आंदोलन करण्यात येईल,असे निवेदन अहमदपूर गटविकास अधिकारी साहेब यांना देण्यात आले. प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,सचिव नवनाथ तरोडे, किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले,ता शहर अध्यक्ष धर्मराज केंद्रे,ता कोषाध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष सतिश पुरी, किनगाव पदाधिकारी योगेश आमले, मोहसीन शेख, प्रकाश जोशी,दशरथ हैगले, महेश चाकाटे, गोविंद आंधळे, वैजनाथ सुनेवाड, दिव्यंग बांधव व प्रहार सेवक उपस्थित होते