दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- लंम्पी स्किन रोगाने देशासोबतच महाराष्ट्रातही थैमान घातणे सुरू केले आहे या लंम्पी स्कीन रोगामुळे अनेक जनावरे बाधित झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांनी आपल्या पाळीव जनावराबाबत सावधानता बाळगावी आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बंजारा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष देविदासभाऊ राठोड यांनी केले आहे.
देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन मानले जाते मात्र त्यावर सध्या लंपी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लागले आहे या आजारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सध्या लंम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकासह इतर नागरिकांमध्ये देखील धडकी भरली आहे मात्र घाबरून जाण्याची गरज नाही गोठ्यात स्वच्छता राखावे एकमेकांना जनावरांची खरेदी- विक्री टाळावी गोठा हवेशीर कोरडा ठेवावा बाधित जनावरांना चरणासाठी बाहेर सोडू नये गोट्यात मासा डास होणार नाही याची काळजी घ्यावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून विभक्त ठेवावे जनावरांना सकस पौष्टिक चारा द्यावे सोबतच सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन देविदास राठोड यांनी केले आहे