दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी डॉ. तानाजी सावंत यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्त्या प्रलंबित होत्या. त्याचाच परिपाक म्हणून या आधीपासूनच जिल्ह्याच्या विकासकामांसाठी मंजूर अनेक कोटी रुपयांचा निधी, जो पालकमंत्र्यांविना तसाच अडगळीत पडून होता, तो कदाचित परतही गेला असता परंतु झालेल्या नियुक्त्या मुळे ती वेळ आता येणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याप्रकरणी चालू वार्ता या दैनिकाने यापूर्वीच वृत्त प्रकाशित करुन आवाज उठवत शासनाचे लक्ष्य वेधले होते.
सोलापूर जिल्ह्यातील भूम-परांडा या विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले डॉ. तानाजी सावंत हे व्यावसायिक व धडाडीचे राजकारणी नेते आहेत. ते शिवसेनेचे उपनेते सुध्दा आहेत. त्यांनी एकूण ३४८ मते मिळवून त्यापैकी २७० अधिक मतांची विक्रमी आघाडी घेतली आहे. सन २०१६ ते २०१९ या दरम्यान महाविकास आघाडीतून सुध्दा विधान परिषदेवर विजयी झाले होते. त्यावेळी सुद्धा आरोग्य मंत्रीपदी असलेले डॉ. सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही धुरा सांभाळत होते.
“मी काय अनाडी दिसतो का, पीएचडी पदवी प्राप्त डॉक्टर आहे.” असे ठणकावून सांगणारे वादातीत मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे संशयाने बघितले जातेय. तथापि कर्तव्य कठोर आणि धडाडी बाणा असलेले मंत्री सावंत यांनी परभणीत कोणतीही वादग्रस्त विधाने न करता बुध्दी चातुर्याने सर्वपक्षीय आमदारांशी समन्वयाची भूमिका घेत प्रशासकीय यंत्रणेवर सुध्दा कटाक्ष ठेवणे गरजेचे राहील जेणेकरुन सर्वांगीण विकासापासून कोसो दूर राहिलेल्या निजामकालीन परभणी जिल्ह्याचा अधिकाधिक विकास साधणे शक्य होईल अशी लोकांची भावना आहे. किंबहुना अधिकांश योजना कार्यान्वित करुन कधी नव्हे एवढा म्हणजेच जास्त प्रमाणात परभणी जिल्ह्याचा विकास साधण्याचे काम निष्ठेने झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्यायाने सरकारचे नाव रोशन झाल्याशिवाय राहणार नाही हे सूत्र ध्यानी ठेवले तर आणि तरच सरकारला भविष्य राहील असा विश्वास आहे. येणारा काळच दाखवून देईल की, लोकांची मने जिंकली जातील हे दिसून येणारी आहे.