दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर
पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा या हेतूने आम.डाॅ.विनय कोरे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून १ कोटी ६० लाखाच्या नळपाणी योजनेला मंजूरी मिळाली आहे.
प्रत्येक गावामध्ये नळाला २४ तास पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे हा हेतू असून मतदार संघातील पैजारवाडी(७९.३४लाख),सुपात्रे (४२.५९लाख),टेकोले (३८.८८लाख) या गावांना देखील निधी मंजूर झाला असल्याचे आम.कोरे यांनी सांगितले.
कोलोली गावची नळपाणी योजना अनेक वर्षापूर्वीची जुणी असल्याने नियमीत बिघाड होत होता.त्यामुळे गावच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पाण्याचा तुटवडा भासत होता.त्याचबरोबर पाणी योजनेच्या दुरूस्तीचा खर्च देखील ग्रामपंचायतीला न परवडनारा असल्याने वेळोवेळी पाण्याची टंचाई निर्माण होत होती.त्यामुळे नागरीकांना नियमीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत होते.या योजनेमुळे नागरीकांना मुबलक पाणी मिळणार असल्याने नागरीकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
अमर बचाटे,मनसे तालुका उपाध्यक्ष, दैनिक चालला माहिती देताना सांगितले की,विद्युत मोटार खराब झाल्याने मागील आठ दिवसापासून गावाला पिण्याचे पाणी नाही.त्यामुळे नागरीकांची गैरसोय होऊ लागली आहे.आम.विनय कोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूण जल जीवन योजनेतून गावाला मोठा निधी मंजूर करून दिल्याबद्दल नागरीकांच्यातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.