दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
जिल्ह्यांसह गेले काही दिवसापासून मुले पळवणारी टोळी जिल्ह्यांमध्ये फिरत असल्यांची अफवा पसरली होती. ही अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्यांने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तसेच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अफवा पसरुन त्याला खतपाणी घातले जात असल्यांने दहशतीचे वातावरण चांगलेच निर्माण झाले होते. मात्र अशा घटना घडल्या नसून अशा अफवांवर विश्वांस न ठेवण्यांचे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी केले आहे. सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणावर असे व्हिडिओ झपाट्यांने व्हायरल होत आहेत मात्र पोलिसांनी हे सर्व मेसेजेस व व्हिडिओ निराधार असल्यांचे म्हटले आहे. अशा अफवा व मेसेजेस कोणीही खात्री केल्याशिवाय वायरल करु नयेत. खात्री करूनच मेसेज फॉरवर्ड करावा. अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यांत येईल असेही सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री.अजयकुमार बन्संल साहेबांनी आवाहन केले आहे. तसेच जर आपल्या परिसरांमध्ये कोणी संशशित मिळून आल्यांस त्यांस कुठल्याही प्रकारची मारहाण न करता स्थानिक पोलिसांची संपर्क साधावा असेही आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल यांनी केले आहे.