दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
एका गावात एक कुटुंब असते त्या कुटुंबात नवरा बायको असतात त्यांच्यात नेहमी वाद चालू असतो आणि एके दिवशी बायको म्हणते अहो तुम्हाला काय तुम्ही आपलं काहीही बोलायचे, काहीही करायचे तुमची कोणतीही गोष्ट निश्चित नसते .एक गोष्ट करायची म्हटली की सतरा वेळा नासतात , असे बायको नवऱ्याला म्हणत असते त्यामुळे नवऱ्याला ऐकून ऐकून त्याच्या डोक्यावर परिणाम होत असतो त्यामुळे नवरा म्हणतो ,बघ आज पासून मी जे ठरवेल ते करेल मरेल पण जेवणार नाही ,पण मी आज जे ठरवलं आहे ते करणारच करणार त्याच्यामुळे मी पहिलं पन्न घेतो की , पण पन्न
काय घ्यायचे हे त्याला पण माहिती नाही ,त्याच्यासमोर कुंभाराची गाढव दिसतात तो बोलता बोलता बोलून जातो की, ही गाढव बघितल्याशिवाय मी जेवण करणार नाही , संध्याकाळचे जेवण ही मी हेच गाढव बघेन व जेवण करेन असे वचन बायकोला देतो
पन्न घेतो. निश्चय करतो .
त्याला प्रण घेऊन महिनाभर होतो, वर्षभर होतो तो पहिल घरी आला की हात पाय धुतल की गाढवाकडे बघायचा व गाढव दिसली की समाधान व्यक्त करून जेवण करायचा आणि नेमकं दीड ते दोन वर्षांनी असा काळ येतो दिवस येतो की त्याला उपवास असतो. पहिल्यांदाच त्यांनी उपवास पकडलेला असतो आणि संध्याकाळी सहा सात वाजता घरी येतो हात पाय धुऊन जेवायला बसतो व पुढे बघतो अंगणात तर गाढवाचं नाही डोकं चक्रावत, भूक लागलेली असते काय करावं बायकोला विचारतो कुठे गेले गाढव बायको म्हणते मला काय माहित मी बघितलं नाही, तुला सांगता येत नाही का बघता येत नाही का बायको म्हणते, आहो तुम्ही निश्चय केला आहे ना त्याला बघितल्याशिवाय जेवणार नाही मग रहा ना उपाशी काय फरक पडतो .तो म्हणतो असं नाही गाढव बघूनच मी जेवण करतो मग तो सात वाजता तो घराच्या बाहेर निघतो ह्याला त्याला विचारत विचारत विचारत गावाच्या बाहेर जातो तिथे काही माणसे असतात त्यांना विचारतो अरे ते आपल्याकडे एकाची गाढवे होती ती दिसली का तुम्हाला त्यातला एक जण म्हणतो ती गाढव पाच वाजता त्या दूरच्या माळावर गेली माती आणण्यासाठी .
मग तो माळाच्या दिशेने धापा टाकत धापा टाकत पोटात आग पडलेली असते आणि मनामध्ये निश्चय असतो, पन्न असतो गाढव बघितल्याशिवाय जेवणार नाही अशा पद्धतीने धापा टाकत धापा टाकत माळाच्या दिशेने जातो माळाच्या दिशेने गेल्यानंतर खाली उतरतो तिथे गाढव त्याला दिसतात ,गाढव दिसल्याने एकदम त्याच्या मनात आनंद झाला कारण आतापर्यंत निश्चित केलेला दिवस होता तो वायाला जाणार नव्हता. तो गाढवाला बघितलं की जेवण करत होता तो जोरात म्हणतो दिसला दिसला म्हणल्यावर तिकडे जो कुंभार होता माती खोदत होता त्याला सापडलं होतं सोन्याचं भांड. आणि तो लगेच म्हणतो कुणाला सांगू नकोस तुझ अर्ध माझा अर्ध त्याला काही कळत नाही तो तिथे जातो व त्याच्या लक्षात येते.
यावरून एकच तात्पर्य निघतो की मनामध्ये जो निश्चय किंवा पन्न केलेला असतो की एखादी गोष्ट मनाशी घट्ट बांधून तिचा पाठलाग करणं याचा फायदा हा होऊ शकतो .एखाद्या गाढवाला बघून जेवण करण्याचं पन्न
घेतल्यावर ही गोष्ट होऊ शकते तर एखादे ध्येय किंवा उद्दिष्टे मनामध्ये जर चांगले घेतले तर ईश्वर कुठे ना कुठे त्या गोष्टीचे फळ देतो .एखादी गोष्ट किंवा एखाद्या रस्त्याने जात असताना किंवा जे मनोमनी ध्येय निश्चित केले असल्यावर आपला जो ध्येयाचा प्रवास आहे तो वायाला नाही जात.