दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
२७ सप्टेंबर हा ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो.एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समुहाने एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी,अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन. संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर हा ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय १९८० मध्ये घेतला. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात सुरवात केली गेली.अनेक देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.भारताचाही जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात एक वेगळा ठसा आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगार उपलब्ध होवून अनेकांच्या तो आधार ही बनला आहे.गेली दोन वर्षे कोविड-१९ च्या संकटामुळे पर्यटनस्थळे ओस पडली होती.मात्र,यावर्षीपासून पुन्हा सर्वच पर्यटनस्थळे खुली झाली असून,पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबू लागली आहे.
भारतासारख्या देशासाठी पर्यटन विकासाला एक आगळे महत्त्व आहे.भारतातील सांस्कृतिक ठेवा, ऐतिहासिक वास्तू,स्थळे,वन्यजीव, नद्या,सरोवरे, धबधबे,समुद्रकिनारे,धार्मिक स्थळे, कृषी पर्यटन पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येतात.आणि त्यातून खूप मोठा महसूल मिळत असतो.भारतात लाल किल्ला, जंतरमंतर,कुतूबमिनार(दिल्ली),गंगोत्री आणि गोमुख(उत्तराखंड)’हप्मी(कर्नाटक)अजिंठा(महाराष्ट्र),यासारखे वारसा स्थळे ही आहेत.प्राचीन ऐतिहासिक स्थळापर्यत भारताकडे फार मोठी संपदा आहे. त्याचबरोबर,निसर्गसंपन्न स्थळेही आहे.केरळ, सिमला,राजस्थान,गोवा,आग्रा,मथुरा स्थळांना पर्यटनदृष्ट्या स्वतःचे असे एक महत्व आहे.महाराष्ट्रात पुणे, मुंबई,महाबळेश्वर,वेरूळ-अजिंठा लेणी,ताडोबा अभयारण्य,कोकण, पाचगणी,माथेरान,ताराकर्ली बीच, कास पठार,तोरणमाळ,चिखलदरा यासारखी अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनाही राबविल्या जातात.भारतात दरवर्षी सरासरी ४० लाख परदेशी पर्यटन येतात.तसेच,विविध पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या देशी पर्यटकांची वार्षिक सरासरी ५३ कोटी ४० लाख आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाने पर्यटन क्षेत्राचा विकास,दळणवळणाचा सुविधा, भौतिक सुविधा,सवलती,सुरक्षितता आणि स्वच्छतेवर अधिक भर दिला पाहिजे.
✍️राजेंद्र पाडवी,तळोदा मो.९६७३६६१०६०