दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जो साक्षात मोठा आहे त्याला मी मोठा आहे हे दाखवण्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागत नाही.किंबहुना ते तसा प्रयत्न चुकुन सुद्धा कळत न कळत सुद्धा करत नाही.या उलट वास्तविक जो मोठा नसतो त्याला क्षणोक्षणी पदोपदी पावलो पावली मी मोठा आहे.माझा मोठेपणा पाहा यासाठी वांरवार घडपड करावी लागते.महणजे जे सत्य असतं ते स्थिर असत . मजबुत असतं परिपक्व अढळ असतं . आणि जे खोटं असतं ते अपरिपक्व, अस्थिर , बैचेन, सदैव चंचल ,असतं . म्हणून स्थिर सत्य हे कधीच विचलित डळमळीत होत नाही.महणुन जो वास्तविक मोठा असतो.तो मोठेपणा दाखवत नाही.तो स्वतः एवढा मोठा असतो .कि त्याला आपला मोठेपणा दाखवुन मोठेपणा मिळविण्याची आवश्यकता पडत नाही . म्हणून मोठेपणा असणं . आणि नसताना आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं हे अलग आहे.मी मोठा आहे हे प्रत्येकाला वाटण वेगळं आणि असणं वेगळं म्हणून समजणं आणि वास्तविक असणं या मध्ये जमिन असमानच अंतर असतं .नदी, नाला, विहीर ,तलाव, यापैकी सगळेचजण आपण स्वतः समुद्र आहेत असं समजु शकतात.समजण्यात काही गैर नाही. पण स्वतः नी स्वतः ला काय समजायचं हे आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धी वर अंवलबुन असतं. कारण समजणं आणि असणं या मध्ये खुप मोठं अंतर आहे . समुद्राला कधी सांगावं लागतं नाही मी समुद्र आहे.तळयाने विहीरीने नाल्याने किती ही धडपड केली . आकांडतांडव केले कि आम्ही समुद्र आहोत तरी सुद्धा फार फरक पडत नाही .कारण वाटलं म्हणून म्हटलं म्हणून समुद्राची उंची गाठता येईल का ? तर नक्कीच नाही कारण समुद्र हा समुद्र आहे तो विशाल आहे . सुर्यमालेतील मुख्य गृह सुर्य हा सुर्य आहे.आता तारंगणातील अनेक गृह तारे हे जर म्हटले आम्ही स्वतः सुर्य आहोत तर फार काही उपयोग होणार नाही .कारण सुर्य हा सुर्य आहे आणि सुर्याला स्वतःचा मोठेपणा सांगण्याची आवश्यकता भासत नाही. कारण समुद्र आणि सुर्य यांचं कार्य विशालता उंची एवढी मोठी आहे कि मोठेपणा सुद्धा खुजा पडेल. असंच काहीसं आज काल आपल्या अवतीभवती सगळीकडे पाह्यला मिळत आहे . सर्व साधारणपणे कार्य क्षेत्र कोणतही असु द्या .तया क्षेत्रात आपणच सगळ्यात मोठे व्यक्तिमत्त्व आहेत .असं सर्वसाधारण पणे प्रत्येकाची धारणा मानसिकता असते.आणि त्याच पद्धतीने त्याच प्रकाटीकरण चालू असतं.आणि ते प्रकाटी करणं हे नंतर व्यसन बनत आणि आपण स्वतः सोडलो तर मग या क्षेत्रात इतर कोणीही आपल्या पेक्षा मोठा नसला पाहिजे हा अंहकार निर्माण होतो . त्यामधुन द्वेष निर्माण होतो .खरं खोटं चांगलं वाईट हितकारक अहितकारक मग काही कळत नाही आणि मन बुद्धी वर सदैव मीच मोठा कसा हे दाखविण्यासाठी प्रकाट करण्यासाठी चालू असलेली धडपड हि विलक्षण गडबड करणारी असती . वास्तविक सिकंदर ने जग जिंकल आणि शेवटी आत्महत्या केली.जग जिंकून काय उपयोग झाला. शेवटी व्यक्तीचा मोठेपणा हा त्यांच्याकडं असलेल्या विनम्रतेवर , दुसर्याच्या प्रति असणारा जो आदरभाव आहे त्यावर तसेच आपल्या सोबत असणारा व्यक्ती याला छोटेपणाची जाणीव होऊ न देणे स्वतः कडे लघुतव घेता आलं पाहिजे व समोरच्या मध्ये मोठेपणा पाहण्याची विशालता असली पाहिजे. तेव्हा कुठे लोक त्या व्यक्तीला मनातुन मोठा समजतं असतात सध्या लोक हुशार आहेत . समोर खोटा खोटा मोठेपणा देतात आणि मागे पार चक्क धुलाई करतात .हा कसला मोठेपणा मोठेपणा हा समक्ष नाही तर परोक्ष व्यक्त होणारी बाब आहे.महणुन आपण मोठे आहोत हे दाखविण्यासाठी प्रकाट करण्यासाठी धडपड करण्या ऐवजी जितकं जमेल तितकं चांगलं कार्य करण कधीही उत्तम असत.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301