दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: काल दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 05:30 वाजता डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर पुण्यतिथी निमित्त द्वितीय व्याख्यानमालेचे आयोजन देगलूर येथील नगरेश्वर मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाले
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवलिंग शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर प्रमुख वक्ते गणेश शिंदे सर
याचा विषय होता अस्वस्थता वर्तमानत संतांचा संदेश माणसातील अहंकार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणसातील अस्वस्थता संपणार नाही. मी कोणीतरी आहे. हि अहंकाराची भावना मनात न ठेवता जगता आले पाहिजे तरच माणूस समाधानाने जगू शकेल असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांनी देगलूर येथे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले ते अस्वस्थ वर्तमानात सताचा
संदेश या विषयावर बोलत होते.. येथील नगरेश्वर मंदिर सभागृहामध्ये आयोजित व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी शिवलिंग बादशाह मठ संस्थान चे श्री.प.अ. १०८ सिद्धा शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर हे होते. तर कार्यक्रमास माजी आमदार सुभाष गावणे,आमदार जितेश अंतापूरकर,माज रामदास पाटील, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, अरुण पाटील हंगरगेकर, डॉ. शिवराज एकलारे जीप सदस्य रामराव नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनिकेत पाटील राजूरकर,माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार, संतोष पाटील, महेश पाटील, अंकुश देसाई डॉ. विनायक मुडे, डॉ. जनार्दन भूमे झवतराव तोरे • अशोक सारखये,अशोक डुकरे, लक्ष्मण मुंग, कैलास येजगे संतोष मंनधरणे माधव पाटील नरंगलकर मुंगडे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या गुरुवातीस राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्प अर्पण केले. त्यानंतर उपस्थितांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनिलउटिश सांगून राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज कि अहमदपूरकर यांच्या कार्याची माहिती देत वृक्ष संवर्धन, आंतरजातीय विवाह, सर्वधर्म समभाव साठी केलेले प्रयत्न व्यसनमुक्ती विभिन्न जात-धर्मामध्ये विश्व निर्माण होण्यासाठी केलेल कार्य त्यांनी प्रास्ताविकातून ठेवला. यांनतर प्रा. डॉ. रवींद्र बेच दोन प्रमुख वक्ते गणेश शिंदे यांचा परिचय करूने दिला. डॉ. सुनील जाधव यांनी होठों पे सच्चाई रहती है है गीत गायले.
पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले कि शेकडो वर्षापूर्वी संतांनी जे सांगितले आहे त्यांच्या शिकवणीनुसार जर आज जगलो तर माणसांच्या जीवनातून अशांती, अस्वस्थता, दुःख नक्कीच दूर होईल भौतिक सुविधेच्या नावाखाली मागमाने निर्माता एवढे ओरबाडले कि. निसर्गनिही त्याच प्रमाणे उत्तरे द्यायला सुरू केले आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोरोना महामारीचे दोन वर्ष होत. आज जी माणसे आपल्यासोबत आहेत त्या माणसांची कदर करायला शिका कारण है गेल्यानंतर त्यांची आठवण करून काही फायदा होणार नाही कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर प्रेम करणाऱ्यामाता-पित्याची सेवा करण्याचे आवाहन यावेळी केले. ते म्हणाले आजकाल नात्यातला गोडवा संपत चालला असल्याने कुटुंबामध्ये अतिवाईकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. वेगवेगळ्या कारणामुळे भीती निर्माण झाल्यामुळे सुद्धा माणसामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण माणूस हा नात्यामध्ये पराक्रम दाखवू पाहत आहे खऱ्या अर्थानि रणांगणात पराक्रम आणि नात्यांत प्रेम दाम पाहिजे तरच माणूस समाधानी जगू शकतो संत तुकाराम, संत मुक्ताई अशा अनेक संतांची उदाहरणे देत कि नात्यातला गोडवा संतांना कळता परंतु माणसाला कळाला नाही त्यामुळेच माणसाचे अंत:करण जात होत चालले आहे आणि त्यामुळेच आजचा माणूस अस्वस्थ झाला आहे आणि त्यातून खऱ्या अर्थाने बाहेर पडायचे असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक असल्याचे सांगितले शेवटी गणेश शिंदे यांनी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानाचा भावार्थ अतिशय मार्मिकआता.. ..१०८ सिद्धदवाल शिवाचार्य महराज बेटमोगरेकर यांनी आपल्या आशीर्वचनात राष्ट्रसंत व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर पांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना अहमदपूर पासून वैद्यकीय व्यवसायापासून ते हिमालयात जाऊन केलेली तपश्चर्या आणि त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाची माहिती सांगितली. ते म्हणाले की डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणजे आम्हा सर्व शिवाचार्यांचे गुगल होते त्यांना कोणतेही प्रश्न विचारले तर उत्तर नेहमी तयार असायचे. बेटमोगरेकर महाराज पुढे म्हणाले कि देवी-देवतांच्या हाती नेहमी राख परिधान केलेले पाहता, कारण से दुष्टांचा संहार करतात परंतु गति के शख नन्हे तर शास्त्र बाळगतात. आणि या शास्त्रामुळेच संत समाजातील भेदभाव, समाजातील दुःख, अस्वस्थता करण्याचे कार्य करतात म्हणूनच ख गावात असणारे संतश्रेष्ठ असतात. असे मत व्यक्त केले, त्यांनी राष्ट्रसंतांच्या या स्मृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून ज्ञानाचे कार्य चालू आहे ते नौका असल्याचे सांगत व्याख्यानमालेची हि शृंखला सदैव पुढे चालू ठेवावी असे आवाहन केले … कार्यक्रमाचे संचालन कैलास देगे यांनी केले तर आभार बालाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शहर, तालुका व परिसरातील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. सदरील व्याख्यानमाला कार्यक्रम यशस्वी करना समितीच्या स पदाधिकायांनी परिश्रम केले.