दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी .
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी ते छठपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत केला जाणार आहे. गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार असल्यांची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे . देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे असेही मोदी म्हणाले. देशातील ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिले जाणार असून दर महिन्याला पाच किलो गहू पाच किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक परिवारांला एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे. प्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तार ९० हजार कोटी पेक्षा जास्त खर्च होणार आहे. मान्सून काळात कृषी क्षेत्रांत अधिक काम असतं.तसेच सणासुदीच्या काळात पैसे लागतात म्हणून दिवाळी आणि छठपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यांच्या शेवटपर्यंत या योजनेची मुदत वाढविण्यांत आली आहे. त्यामुळे देशांतील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूंन यंदाच्या दिवाळीत चांगलाच दिलासा मिळणार आहे.