दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी शहरातील शासकीय कार्यालयात नागरिकांना चकरा मारण्याची गरज पडू नये. एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी शासनाने महा-ई-सेवा अर्थात सेतू सुविधा केंद्राची स्थापना केली; परंतु आता या सेतू सुविधा केंद्राचे संचालकच गोरगरिबांची आर्थिक लूट करीत आहेत. सेतू सुविधा केंद्रांकडून होत असलेल्या जनतेच्या लुटीबद्दल तहसील कार्यालय अनभिज्ञ आहे की लुटीचा हिस्सेदार आहे असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. शहरातील गोरगरीब, अल्पशिक्षित नागरिक व ग्रामीण भागातील अशिक्षित, अल्पशिक्षित ग्रामस्थांना महत्त्वाच्या कागदपत्रासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी पैसे खर्च करून जावे लागत असे. एखाद्या कागदपत्रासाठी किंवा प्रमाणपत्रासाठी अनेक वेळा शासकीयएखाद्या कागदपत्रासाठी किंवा प्रमाणपत्रासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असत. जनतेची होणारी गैरसोय आणि त्याचा होणारा खर्च लक्षात घेऊन शासनाने कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात विविध प्रकारचे परवाने, अनुज्ञप्ती, सातबाराचा उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सेतू सुविधा केंद्राची स्थापना केली. या सुविधा केंद्राकडूनच आता जनतेची खूप मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे समोर येत आहे. देगलूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन, सिंधू कॉलेज जवळ एक, ● पंचायत समिती समोर एक, जुन्या बसस्थानका जवळून जाणाऱ्या भक्तापूर रोडवर एक असे एकूण पाच सेतू सुविधा केंद्र आहेत. सुरुवातीच्या काळात या सेतू सुविधा केंद्र संचालकाकडून जनतेला चांगली सेवा देण्यात येत होती.