दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
महाराष्ट्र राज्यातील दसरा मेळावा आणि चर्चा हे समिकरण आहे. मग चर्चा आणि कारण हि वेळेनुसार बदलती असली तरी लोकांची नजर मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथील सकाळी होणार मेळावा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख यांचं त्यातील मार्गदर्शन तसेच नागपुरातील दिक्षा भुमिवरील उसळणारा जगसागार मग दुपारी भगवान भक्ति गड सावरगाव येथे होणारा मेळावा व यामध्ये स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या मुंडे भगिनी यांचं मार्गदर्शन आणि संध्याकाळी शिवतीर्थ येथे होणारा शिवसेना पक्षप्रमुख यांचा मेळावा लक्षणीय असतात. मात्र या वर्षी या मध्ये आणखी एक मेळाव्याची भर पडत आहे ज्याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे तो शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा राज्यात दसरा जवळ आला कि राज्यातील राजकीय सामाजिक वातावरण तापायला लागत . अगदी उन्हाळ्या सारखं उन असणारा हा महिना पण त्याच प्रमाणात सामाजिक वातावरण पण तापलेल असतं आणि सध्या तर विचारायला नको . नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तर सावरगाव तालुका पाटोदा येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा व मुंबईत शिवसेनेचा हे राज्यातील प्रमुख आणि प्रभावी व चर्चेतील दसरा मेळावे . मुंबईतील मेळावा शिवसेनेशी निगडित आहे.तर नागपुरातील मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे .पण या पेक्षा वेगळा व सगळ्यात प्रचिण दसरा मेळावा हा जो ग्रमिण भागातील लाखो भक्तांच्या भेटीचा भगवान बाबा यांचा भक्ति शक्तिचा दसरा मेळावा असे राज्यात तीन दसरा मेळावे दर वर्षी परंपरेनुसार भरत असतात .या मेळाव्याची चर्चा मात्र संबंध देशभरात होत असते . राष्ट्र संत भगवान बाबा हे आधुनिक काळातील समाज सुधारक होते तसेच बाबांनी प्रचंड अशा घनघोर कठिण तप साधनेच्या बळावर नवनिधी अष्ट सिद्धी प्राप्त केल्या होत्या ज्याचा उपयोग समर्थ लोक कल्याण करण्यासाठी केला . तसेच बाबा हे महाबली हनुमंत , विश्व गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नंतर नजिकच्या काळातील ब्रह्मचारी महान तपस्वी योगी कृतीशिल समाज सुधारक व देशाच्या तसेच मराठवाड्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामात अध्यात्म भक्ति अहिंसा मार्गाने अलौकिक योगदान असणारे तसेच निजामशाही राजवटीत अहिंसा मार्गाने गोहत्या बंद करण्यासाठी कृतिशील प्रयत्न म्हणून प्रत्यक्ष चिंचाळा तालुका वडवणी जिल्हा बीड येथे स्वतः उपस्थित राहुन दिव्य अशा संघर्षाच् रूपांतर ईश्वरी चमत्कारात केलं .गायीचा बळी देण्यासाठी जो सज्ज झाला त्याने राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या दिव्य ईश्वरी शक्ति ची परिचिती येताच . प्रत्यक्ष क्षणार्धात गाय सन्मान पुर्वक सोडली .व बाबांच्या चरणी लिन झालं .बाब हे नवनिधी अष्ट सिद्धी प्राप्त महान योगी कळीकाळवर अधिराज्य असणारे महापुरुष परस्पर विरूद्ध असणारे पशु पक्षी यांना एकत्र करण्याची ताकद बाबांच्या वाणीत होती.अंबाजोगाई येथे अदय संत कवी मुकुंदराज यांच्या मंदिर जवळ निर्मनुष्य प्रचिण गुफा आहे येथे त्या वेळी सगळे हिंस्र पशु पक्षी निवास करत या ठिकाणी तब्बल अडिच वर्ष निर्जळ तपस्या केली त्यावेळी अनेक प्रसंगी नाग,मुंगस,वाघ,सिंह, हिंस्त्र पशु अगदी आजुबाजूला गुण्यागोविंदाने बसयाचे नागतर अंगावर वेटाळे घालून असयाचे एवढं सामर्थ्य बाबांन मध्ये तप शक्ति ने निर्माण झालं होतं. म्हणून निजामशाही राजवट असताना सुद्धा महान राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या आध्यत्मिक शक्ति सामर्थ्य वर ऐतिहासिक गोहत्या बंदी यशस्वीझाली. बहुजन समाज शिकला पाहिजे. यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजात दारोदरी पोहचवली. संबंध महाराष्ट्र राज्य सह देशाला आध्यत्मिक उपदेश उपलब्ध होईल यासाठी धर्म शास्त्रानुसार दिव्य गड निर्माण केला . गडावर शाळा महाविद्यालय सुरू केले. उच्च शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून औरंगाबाद येथे दोन एकर जमीन खरेदी करून अन्न छात्र नावाने बोर्डीग चालू केली ज्या मध्ये शिकुन हजारो लाखो विद्यार्थी घडले . निजामशाही व इंग्रज राजवटीत लोकांना एकत्र आणता यावा . संवाद साधुन मार्गदर्शन करून उपदेश देता यावा . लोकांच्या मनात आध्यत्मिक ज्ञान गोडी निर्माण व्हावी म्हणून नारळी साप्ताह परंपरा सुरू केली . ती राष्ट्र संत भगवान बाबा यांनी आणि भगवान बाबा यांचे अलौकिक कार्य पाहुण महाराष्ट्र राज्य चे पाहिले मुख्यमंत्री सह्याद्री चा सिंह यशवंतराव चव्हाण यांनी एक मे 1958 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहुन राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या कार्या बदल गौरव करून राष्ट्र संत भगवान बाबा यांनी निर्माण केलेला धैम्य गडाचं लाखो लोकांच्या उपस्थितीत भगवान गड असं नामकरण केले . एकंदरीत मराठवाडा आणि महाराष्ट्र नव्हे तर तेलंगणा , मध्य प्रदेश, गुजरात या सारख्या राज्यात सुद्धा बांबाना मानणारा खुप मोठा भक्त वर्ग निर्माण झाला होता .तो आजतागायत सुद्धा तसाच कायम आहे . भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या दसरा मेळावा परंपरेला स्वर्गिय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी विशाल रूप देऊन राज्याच्या राजकारणात सत्तापरिवर्तन करण्याची ताकद शक्ती भगवान गड दसरा मेळाव्यात निर्माण केली.हिच परंपरा पुढे साहेबांच्या नंतर सुद्धा अगदी त्याच उत्साहात चालू आहे.आणि राष्ट्र संत भगवान बाबा यांचा दसरा मेळावा हा भगवान गडावरून बांबाच जन्म गाव सावरगाव घाट तालुका पाटोदा या ठिकाणी आला .तोच जोश तिचं परंपरा तीच भक्ती तीच शक्ति किमान दहा ते पंधरा लाख लोकांचा जनसमुदाय आणि मुंडे कुटुंबातील वघिन पंकजाताई यांचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी उपस्थिती असणारा हा राज्यातील शंभर ते दिडशे विधानसभा मतदारसंघातून आलेला बहुजन समाज हा एक उर्जा घेऊन आपल्या घरी परत जात असतो . कितीही संकटं वादळ आली तरी दसरा मेळावा आणि गर्दी व हेलिकॉप्टर हे समिकरण आणि भगवान बाबा यांच्या घोषणा अगदी जल्लोष .हिच परंपरा अखंडीत चालू आहे. यावर्षी पण उत्सुकता आहे. ते गर्दीच उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात चालू झालेली तयारी विलक्षण आहे . नागपूर, भगवान भक्तिगड सावरगाव, शिवतीर्थ मुंबई, आणि यावर्षी चौथा बीकेसी येथील शिंदे सेनेचा मेळावा हे मेळावे राज्यातील जनतेच लक्ष्य वेधणारे लक्ष वेधी ठरत असुन यशस्वी व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. एवढं मात्र नक्की.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301