दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली: उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिशय निंद्य घटना घडली होती. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये. त्याचप्रमाणे अशा घटनांचा निषेध करणे हा मुस्लिम समाजाचा स्वभाव व्हायला हवा, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवास संबोधित करताना बुधवारी व्यक्त केले.
रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवास संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिशय निंद्य घटना घडली. त्यामुळे संपूर्ण समाज हादरला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या घटनेचा निषेध मुस्लिमांमधील काहीच प्रमुख व्यक्तींनी केला.
मात्र, अशाप्रकारे निषेधाची भावना अपवादात्मक राहून उपयोग नाही. तसा स्वभाव संपूर्ण मुस्लिम समाजाचा व्हायला हवा. त्यासाठी हिंदू समाजाचे उत्तम उदाहरण आहे. कारण, अशा घटना घडल्या तर हिंदू समाजातील एक मोठा वर्ग पुढे येऊन त्याचा निषेध करतोत्याचा विरोधही कर, त असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले.
संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना लोकांकडून गांभीर्याने ऐकून घेतली जात असल्याचे डॉ. भागवत यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, हाच आशय मान्य असलेले परंतु केवळ हिंदुराष्ट्र या शब्दास विरोध असणारेही काहीजण आहेत. ते या शब्दाऐवजी अन्य कोणता शब्द वापरतात. संघाचा त्याला विरोध नाही. पण ही संकल्पना सुस्पष्ट असावी यासाठी संघ मात्र, हिंदुराष्ट्र या शब्दासाठीच आग्रही राहणार आहे.
संघाकडून किंवा संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती तथाकथित अल्पसंख्यांकांमध्ये पसरविली जात आहे. असे कधीही घडले नाही, आणि यापुढेही घडणार नाही. अन्याय, अत्याचार, द्वेषभावनेतून समाजात गुंडगिरी करणाऱ्या सामाजिक शत्रूंपासून स्वतःचे व आप्तांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. यात कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. समाजात बंधुभाव, सभ्यता आणि शांती राखण्याकरिता संघ संपूर्ण दृढनिश्चयानिशी काम करत राहाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.