दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज देशभरात एकाचवेळी पार पडली. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले.
कॉंग्रेस मुख्यालयात मतदान केल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, नव्या अध्यक्षाची प्रतीक्षा होती. निवडणूक संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता निवडणूक प्रभारी मधुसुदन मिस्त्री पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, 9,500 प्रतिनिधींनी आज मतदान केले. यात विविध राज्यांमध्ये 96% मतदान झाले असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच एआयसीसी, दिल्ली येथे 87 जणांनी मतदान केले.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 24 वर्षांनंतर आज मतदान झाले. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे. देशभरातील प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पीसीसी) कार्यालयात 9 हजार प्रतिनिधी (मतदार) मतदान केले. यापूर्वी 1998मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात झालेल्या निवडणुकीत मतदान झाले होते.
मतदानापूर्वी शशी थरूर यांच्या निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. थरूर यांना राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत. त्यानंतर कोणत्याही कार्यकर्त्याला पोलिंग एजंट बनवण्यास पक्षाने हिरवा कंदील दिला होता. कॉंग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जे प्रतिनिधी मतदान करतात तेच पोलिंग एजंट असतात. कर्नाटकात भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासमवेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींसाठी कंटेनरमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते.