दैनिक चालु वार्ता परभणी जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
दिवसेंदिवस बदलत चाललेल्या या सत्ता संघर्षात राजकारणाचे पूर्ण गजकर्ण बनले जात असून भोळी भाबडी जनता मात्र हक्काच्या विकासापासून कोसो दूर फेकली जात आहे. याचा कुटील खेळीत मश्गुल हे राजकारणी कधी विचार करणार. आहेत का नाही, याचे शल्य मात्र बोलल्याशिवाय राहाणार नाही.
परभणी : अंधेरीत भाजपच्या भुर्जी पटेलने माघार घेतली असली तरी निवडणूक ही अटळ आहे. आपकी कंपनी पार्टी, पिपल्सचे बाला व्यंकटेश विनायक नाडार, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोहर श्रावण नायक व अन्य चार अपक्ष उमेदवार रिंगणात बाकी असल्यामुळे विजयी होण्याची खात्री असूनही उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना निवडणूकीच्या रिंगणात शेवटपर्यंत राहावेत लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अटळ असून ती ठरल्या वेळी होणारच आहे.
दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तो निर्णय जाहीर केला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे ही निवडणूक बिनविरोध केली जावी असे भावनिक पत्र पाठवून. भावनिक साद घातली. त्यातच बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मैत्रीचा दाखला देत भाजपा नेत्यांना पत्रे पाठवून भाजपा उमेदवाराचा अर्ज माघारीचे आवाहन केले. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर भाजपातर्फे उमेदवारी माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली.
भाजपाच्या माघारीने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून रिंगणात अद्याप सात उमेदवार बाकी असल्यामुळे सदरची निवडणूक अटळ ठरली आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यातच राज्यात शिंदे गटाच्या बंडाळी मुळे उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावे लागले गेल्याने समस्त शिवसैनिकांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली होती. त्यामुळे अधिकच इर्षेला पेटलेला शिवसैनिकांचा रोष व सोबतीला द्वेषही वाढीस लागला गेला. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह आठवले रिपाइं चा बिनशर्त पाठिंबा मिळाला. अन्य काही घटक पक्षांनी साथ दिली होती. त्याशिवाय निवडणूकांच्या धामधुमीतच कांही संघटना व अनेक शीर्षक नेत्यांनीही प्रवेश करुन शिवसेनेची ताकत बऱ्यापैकी वाढवली गेली त्यामुळे ऋतुजा लटके यांचे पारडे अधिकच जड झाले होते. तद्वतच शिवसेनेच्या विश्वासू विजयाचा वारु अधिकच भरधाव वेगाने धावू लागला. असं विश्वासू चित्र सर्वत्र दिसत असतांनाच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि राज ठाकरे यांनी ऋतुजांचे पती रमेश लटके यांचेशी मैत्रीचे नाते जोडून भाजपाला माघारीचे जे भावनिक आवाहन केले केले एका बाजूला पथ्यावर पडणारे असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र पूरते टीकेचे लक्ष्यही बनले गेल्यास आश्चर्य वाटू नये.
या नेत्यांना निवडणूक माघारीचे तथा भावनिक आवाहनासाठीचे तसे प्रयत्न करायचेच होते तर ते अगोदरच का केले नाहीत ? शिवसेनेचा जोश कमालीचा वाढलेला असतांनाच व विजयाची खात्री शिगेला पोहोचली असतानाच असे आवाहन करुन या नेत्यांना नेमकं आय साध्य करायचे होते का आणखी काही वेगळेच साधायचे आहे, हे येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे. या माघारी नाट्यामुळे भाजपालाही विजयाची खात्री नसल्याचे पूर्णपणे दिसून आले असावे. तसं असलं तरी या निमित्ताने भाजपामध्येही दोन गट व त्यांची मते भिन्न असल्याचे आढळून आले. शिवसेनेच्या अनेक घटना गटातून या माघारी वर आणि विविध नेत्यांच्या कथित खेळीवर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होऊ लागली आहे. त्या खेळीमध्ये प्रत्येकांचा कांहीं तरी स्वार्थ दडल्याच्या कुत्सीत टिळकांनी ही बराच जोर धरलाय गेल्याचे पावलोपावली दिसत आहे.
पत्राचाळ प्रकरणीच्या आरोपाखाली स्वायत संस्थांनी जेलमध्ये टाकलेले राज्यसभा सदस्य तथा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी तर भाजपाच्या केळीवर घणाघाती टीका करुन तब्बल ४४हजारांच्या मताधिक्यांनी ऋतुजा लटके यांचाच विजय नक्की होता असे ठासून सांगितले. तोच धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही भाजपावर सडकून टीका केली. ज्यामुळे भाजपाला तर सोडाच परंतु शरद पवार व अंजीर पवारांच्याही ते चांगलेच जीव्हारी लागल्याचे पुढे आले आहे. भाजपाने घेतलेल्या माघारीचे श्रेय कोणाला द.यायचे ते द्या, परंतु कोंबडा करवला एवढे नक्की, असे मिस्कीलपणे बोलून शरद पवार यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केलेले वक्तव्य मात्र
मुळीच लपून राहिले नाही. एवढ्यावरच न थांबता सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घणाघाती टीकेवर ही शरद पवार यांनी कमालीची नाराजी व्यक्त करीत काम चांगले होऊनही वातावरण दूषित होईल अशी टीका करणं योग्य नसल्याचे खडे बोलही सुनावले. त्यानंतर वाटले पवार यांनीही तोच सूर आवळत टीका करणाऱ्यांना तोंड बंद करण्याचा अनाहूत सल्लाच दिला.
माध्यमांनी या प्रकरणी भाजपाचे उमेदवार बुरजी पटेल यांना विचारले असता त्यांनी मी नाराज नसल्याचे ठामपणे सांगितले. एवढेच नाही तर भाजपा आमची आई असून मी यापुढेही भाजपा वाढीबरोबरच जनसेवा ही अधिक प्रमाणात करीत राहीन असे ते म्हणाले. भाजपा व श्रेष्ठी वर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे माझ्यावर कोणाचा दबाव असण्याचे कारणच नाही व मी अपक्षही लढणार नाही असे पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले. तर तिकडे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी माघार घेतलेल्या भाजपा व श्रेष्ठी चे आभार मानत उमेदवारी जाहीर झाल्यापासून पक्षाचे नेते, समस्त शिवसैनिक, अन्य सहकारी पक्षांचे नेते, कार्यकर्ते, स्व. रमेश लटके यांचे सहकारी, मित्र आदींनाही धन्यवाद दिले. अहोरात्र मेहनत घेऊन त्या सर्वांनी विजयासाठी साथ दिली, उर्जा दिली त्यामुळे माझी सुध्दा काम करण्याची इच्छाशक्ती कमालीची वाढली गेल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचेही मनापासून आभार व्यक्त केले. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे निक्षून सांगितले. दरम्यान शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला माघारीसाठी केलेल्या अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणीही याप्रकरणी कोणतीही वाच्यता केली नाही. कदाचित त्या सर्वांचे स्व रमेश लटके यांचेशी चांगले संबंध असावेत म्हणूनच त्यांनी आपला उमेदवार ही रिंगणात उतरवला नसावा. भावनिक नाते जपले असावे असेही बोलले गेल्यास आश्चर्य वाटू नये. निवडणूक जाहिर झाल्यानंतर केवळ आणि केवळ पक्षचिन्ह व पक्षाचे नाव हे दोन्ही विषय या निमित्ताने का होईना परंतु निकाली लागावेत म्हणून तो विषय सुध्दा लावून धरला असावा. बऱ्याच जणांनी असेही बोलून दाखवले की, शिंदे गटाला या मतदार संघातून निवडणूकच लढवायची नव्हती तर आकाश तांडव का म्हणून केले, ज्यामुळे भाजपाचा फायदा होऊ शकेल. परंतु ही निवडणूकच खऱ्या अर्थाने भावनिकदृष्ट्या गुंतली गेल्याने ती पार पडू शकणार नाही, यांची खात्री वाटली असावी
परंतु जोपर्यंत कोणी मागणी करण्यास पुढे येणार नाही तोपर्यंत घोडा रेसमध्ये ठेवायचा जणू हेच मनोमनी काढले असावे असेही बोलले गेल्यास गणित चुकीचे ठरु नये. हेही भाजपाला चांगलेच माहित होते की, जर उमेदवारी माघार घेतली गेली तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबईचे भाजपा अध्यक्ष शेलार या दोन्ही नेत्यांची पूरती नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही. तरीही हा डाव भाजपाने पध्दतशीरपणे हाताळला हेही तितकेच आश्चर्य कारक असेच म्हणावे लागेल.
दरम्यान आपला पराभव निश्चित होणार याचे इंगित ओळखून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचेही पुढे आल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे भावनिक नात्याची झालर जोडून आमची तशी संस्कृतीच नसल्याचे वक्तव्य करुन फडणविसांनी एकप्रकारे मागच्या आठवणींना उजाळा देण्यास भाग पाडल्याचे पुढे आले. भाजपाला भावनिक नात्याची संस्कृती आताच कशी काय आठवली का ती ओढून ताणून जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला असावा तरीही या वक्तव्याने भाजपाचेच पितळ उघडे गेल्यास नवल ते कसले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचं निधन झालं होतं तेव्हा, त्यांच्या पत्नी पोटनिवडणूकीला उभ्या राहिल्या होत्या आणि त्याचवभाजपने भीमराव तापकीरे यांना उमेदवारी दिली व निवडूनही आणले. त्याशिवाय त्यानंतर पंढरपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत सुध्दा स्व. भरत भालके यांच्या मुलांचाही भाजपनेते पराभव करण्यासाठीचे प्रयत्न केले होते ज्यामुळे येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. या दोन्ही. वेळी भाजपाला संस्कृतीचे झालेले विस्मरण अजूनही राजकारणी मंडळींच्या स्मरणात राहिले नसावे असे भाजपला वाटते का ? शरद पवार किंवा अजित पवार यांनाही खडकवासला मतदार संघातील सर्व. वांजळे यांच्या पत्नी बाबत आवश्यक असलेल्या भावनिक संस्कृतीचे विस्मरण का बरे झाले असावे ? हा खरा सवाल आहे. मग आता तरी उशीरा सुचलेले शहाणपण म्हणून भाजपला टोमणा मारण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तरी उरतो का ? असे विचारले गेल्यास तेही वावगे ठरणार नाही. किंवा राज ठाकरे यांनाही त्या प्रसंगाचे झालेले विस्मरण निश्चितच विचार करायला लावणारे ठरले गेल्यास आश्चर्य वाटू नये. अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाबतीत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका कितपत संयुक्तिक होती याचा जाब विचारण्यासाठी एका शिवसैनिकांने माजी गृहराज्यमंत्री तथा मनसेचे विद्यमान नेते बाळा नांदगावकर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्याला चक्क अश्लाघ्य शिवीगाळी करुन जो त्या शिवसैनिकांचा उध्दार केला हे कितपत योग्य आहे ? राज ठाकरेंना हा प्रकार कितपत रुचला जाईल का, तेही नांदगावकरर यांचेच समर्थन करतील हे आगामी काळात दिसून येणारच आहे. परंतु तोपर्यंत हे प्रकरण मिडीयात मात्र पूर्णपणे लावून धरल्याचे दिसून येत आहे.
एकूणच राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर लागलेली विधानसभेची पोटनिवडणूक ह्या दोन्ही बाबी भिन्न असल्या तरी राजकीय चर्चांना उधाण व खतपाणी घालणाऱ्याच ठरल्या जातात की काय, जणू अशीच भीती वाटल्यावाचून राहातं नाही. आपला फायदा कशात आहे, यांचे सोयीनुसार आराखडे आखणाऱ्या नेत्यांच्या राजकीय. खेळी कधी आणि कशा बदलल्या जातात, हे सुध्दा या निमित्ताने उजागरपणे दिसून आल्याशिवाय राहातं नाही. बदलणारे राजकारण आणि पक्ष्या पक्ष्यामधील मतभेद कसे पथ्यावर पाडून घेता येतील भले त्यासाठी गळ्यातले काढून खुंटीवर अटकवणे भाग पडले तरी चालेल, आपल्या राजकीय अब्रूची धिंडवडे निघाले तरी चालेल परंतु उपयोगात येऊ शकेल अशी खेळी खेळताना प्रसंगी गुंडाळून ठेवावे लागते तरी चालेल मग त्यासाठी वाटेल ते करावे लागले तरी अशी किळसवाणी राजकीय खेळी कधी कधी तर कुटील नीतीकडेही वळत असल्याचे दिसून आल्यास मुळीच आश्चर्य वाटणार नाही. पण ती अत्यंत अशी गायकही ठरल्याशिवाय राहाणार नाही याचेही विस्मरण होता कामा नये. म्हातारी मेल्याचे दु:आ नाही परंतु काळ सोकावता कामा नये. याला वेळीच आवर घालून योग्य दिशेने राजकारण केले गेले तर याकुटील राजकारणाच्या खेळीमुळे नागरी विकासाच्या गंगेवर मात्र पूर्णपणे विनाशाचे पाणी पेरले जात आहे याचाही विसर पडला जातोय एवढे नक्की !