दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : टी -२०विश्वचषक २०२२ चा २४ वा सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात पर्थ येथे खेळला गेला, जिथे झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १धावाने पराभव केला. यासह, सुपर १२ मध्ये पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. पाकिस्तानच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडूंना धक्का बसला असून ते आपला राग भारतावर काढत आहेत.
टी-२० विश्वचषक २०२२ च्या २४ व्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अवघ्या १ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ८ गडी गमावून १३० धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ २० षटकांत ८ विकेट गमावून १२८ धावाच करू शकला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवाचा राग भारतावर काढला आहे.
विशेष म्हणजे २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला आहे. सुपर १२ च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. त्याचवेळी झिम्बाब्वेविरुद्धचा सामनाही अतिशय रोमांचक झाला. हा सामनाही शेवटच्या चेंडूपर्यंत गेला जिथे पाकिस्तानला अवघ्या १ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.