दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात दिवाळी सणा दरम्यानच्या कालावधीत एका मोबाईल शॉपी फोडून सुमारे ५८ लाख ५१ हजार रुपये किंमतीची मोबाईल्स चोरीला गेल्याची आकडेवारी परभणी पोलिसांनीच दिली आहे. या दुकान फोडीसह आणखी दुसऱ्या तीन चोरीच्या घटना झाल्याचे विविध पोलीस ठाण्यात गुदरलेल्या तक्रारींमुळे सिध्द झाले आहे. वर्षे भर पोटाला चिमटे घेऊन जमवलेल्या पै-पैसा नि जीवन जगताना कठीण प्रसंगी कधी तरी उपयोगाला येऊ शकतील या आशेने बनवलेले सोन्या-चांदीचे किडूक मिडूक अर्थात दाग दागिनेही जर चोरांनी लंपास केले तर त्या त्या परिवाराला काय वाटले असेल, यांचा विचार ज्याचं जळतं तोच करु शकतो. ऐन दिवाळीच्या सणावेळी झालेला आघात सहन करण्याची हिम्मत सुध्दा ते परिवार हरवून बसले जाते स्वाभाविक आहे. गावी जातांना या साऱ्या बाबी नियमित गावाला किंवा सोबत नेणे परवडणारे नसते शिवाय ते एखाद्या बॅंकेतही ठेवणे परवडणारे नसते म्हणून घरातल्या एखाद्या कोनाड्यात किंवा अडगळीत लपवून ठेवले जातात. तरीही चोरांकडून डल्ला मारला जातोच हे सुध्दा दुर्दैवच म्हणावे लागेल. मोल मंजूरी व काबाड कष्ट किंवा ठराविक पगारावर आपला प्रपंच चालवणारा प्रत्येक जण आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकही ठेवू शकत नसतो एवढे नक्की. अशा वेळी त्या प्रत्येकाची भिस्त असते फक्त आणि फक्त पोलिसांवरच. प्रत्येक नागरिक किंवा घरांना पोलीसही सुरक्षा देऊ शकत नाहीत हे जरी खरे असले तरी कर्तव्यावरील पोलिसांची गस्त जर राहिली असती तर मात्र बराच फरक पडला असता, कदाचित या चोऱ्या घडल्याही नसत्या. शिवाय गस्त घालणे हे पोलिसांचे कर्तव्यच ठरले जाते. ते कर्तव्य पोलिसांना नाकारुन चालणारे नसते. पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे जसे पोलिसांंचे कर्तव्य ठरले जाते किंबहुना सर्वसामान्यांना सुरक्षा देणे सुध्दा ते त्यांचे परम कर्तव्यच असते. जनतेला वैयक्तिक नाही परंतु गस्तीच्या रुपाने दिली जाणारी सेवा हीच नोकरी ठरली जाणे आणि त्या बदल्यात त्यांना मानधन म्हणजेच वेतन दिले जाते यांचेही विस्मरण होता कामा नये. पोलिसांनी दूर्लक्ष केले तर निश्चितच चोरांचे पावले जाते. इमाने इतबारे व कठोरतेने कर्तव्य पार पाडले गेले तर ती सेवा ठरते नि कर्तव्यात कसूर नि जाणिवपूर्वक गैरशिस्तीला उत्थान दिले गेले तर मात्र जनतेप्रति या
म्हणा किंवा कर्तव्याप्रति असलेली प्रतारणाच असल्याचे दिसून येत असते. हे मुळीच नाकारता येणार नाही. कर्तव्यावर रुजू होणारा प्रत्येक कर्मचारी म्हणा की अधिकारी तो आपल्या पट्टयाला स्मरुण किंवा एखाद्या देशाच्या प्रतिमेला स्मरण करुन हेच म्हणत असतो की, आजचा दिवस चांगला जावू दे, माझ्या कार्यक्षेत्रात आज काहीसुद्धा अघटीत होता कामा नये, अशी प्रार्थना करीत असतात. नव्हे त्यांच्या प्रांजळ मनाला वाईट दुर्बुध्दीचा लवलेशही लागता कामा नये. तथापि विद्यमान परिस्थितीत नेमकं काय चालतं, याचा अनुभव तर प्रत्येकाला ठायी ठायी येतच असतो. मानवतेचा विसर पडणाऱ्या त्या घटनांना अधिकच वाव मिळत असल्यानेच कदाचित चोऱ्या, घरफोड्या सारख्या प्रकारांना अधिकच बळ मिळाले जाते, कधी कधी प्रोत्साहन ही दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हे दुर्दैवाने सांगणे भाग पडले जाते.
परभणी शहरातील लोकाशा नगरात जी घरफोडीची घटना घडली आहे, त्यात २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल गेल्याचे तक्रारीवरून दिसून येत आहे. रोख रक्कम व दागिन्यांचा समावेश असल्याने या परिवारावर आणायचं झाला आहे.
दुसरी चोरीची घटना घडली आहे ती, म्हणजे दासगणू नगरातील आहे. सुमारे ६० हजारांचा काही ऐवज व रोकड यांचा अंतर्भाव असल्याचे समजते तर तिसऱ्या घटनेत रुपये ५४ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीवरूनच सिंध्द होत आहे. शिवराम नगरातील ही घटना आहे तर चौथी मोठी घटना म्हणजेच नारायण चाळीतील मोबाईल दुकान फोडीची. करोडोंचा माल चोरीला गैल्याची अगोदर उडवलेली बोंबाबोंब आता पोलीस सुत्रांकडून ५८ लाख ५१ हजारांची चोरी झाली असल्याचे
पुढे आले आहे. पैकी ४ लाख १ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नुकताच जप्त केला असून त्यात लिप्त दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आंतरराज्य टोळीची उपमा देऊन पोलीस अधीक्षकांनी तर खळबळच उडवून दिली आहे. यातील अजून तिघेजण फरार असून त्यांनाही लवकरच शोधून काढले जाईल असा विश्वास अधीक्षक सुधाराग आर.यांनी व्यक्त केला आहे.
एकूणच चोरी, घरफोडीच्या चारही घटना दिवाळी सणादरम्यानच घडल्या आहेत. सणाच्या आनंदावरच चोरीच्या प्रकाराने विरजन पडले गेले आहे त्यांची दिवाळी मात्र दु:खमय अशीच म्हणावी लागेल यात शंकाच नाही. पोलिसांच्या गस्ती ची नितांत आवश्यकता आहे हे मुळीच नाकारता येणार नाही. पोलीस अधीक्षक सुधाराग आर. कडक आदेश देऊन कोणाच्याही बीटमध्ये (कार्यक्षेत्रात) चोरी, घरफोडी, लूट, मंदीर चोरी यांसारख्या घटना घडता कामा नये, असे सक्तीचे निर्देश बजावले जाणे गरजेचे ठरणार आहे. नव्हे तो जनतेचा हक्कच आहे. त्यांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. हे पोलिसांनाही नाकारता येणार नाही असं म्हटलं गेलं तर चुकीचं ठरु नये.