दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:वीर सैनिक ग्रुप चॅरीटेबल ट्रस्ट नांदेड ता. देगलुर जि. नांदेड च्या वतीने देगलुर नगरीत प्रथमच भारतीय सैनिकाद्वारे दिपावली निमित्ताने आजी माजी सैनिकांचा स्नेह मेळावा सिध्देश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला .
या पूर्वी पण वीर सैनिक ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड ता. देगलुर च्या वतीने जे सैनिक सुट्टीवर येतात आणि देश सेवा तर करतातच त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, कोरोना काळात अहोरात्र आरोग्य सेवा करणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या कोरोणा वॉरियर्स म्हणून सत्कार करणे, आजी माजी सैनिकांच्या सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना तथा राजकीय नेत्यांना भेटून सैनिकांच्या समस्यांवर चर्चा करून त्याच्या समस्या सोडवणे असे अनेक कार्य करत असतात.
काल झालेल्या कार्यक्रमाची सुरवात शहीद भगतसिंग आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करूण देश भक्ती गीत द्वारे करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे तसेच माजी सैनिक व सेवारत सैनिकांसह त्यांच्या आई वडिलांचे आणि पत्रकार बांधवाचे पत्रकारिता आणि सामजिक कार्य मध्ये विशेष कार्य करणाऱ्यांचे सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले .
सर्व प्रथम सुभेदार शाम कस्तुरे साहेबांनी ग्रुपची स्थापना, संकल्पना आणि कार्य याविषयी संबोधन केले त्यानंतर सैनिक प्रवीण देवडे यांनी वीर सैनिक ग्रुप स्थापनेमागील उदेश्य, भूमिका, आणि सामाजिक कार्याविषयी संबोधन केले.श्री ज्ञानेश्र्वर डूमने यांनी राजे छत्रपती अकॅडमी स्थापना मागील उदेश्य, भूमिका, आणि सामाजिक कार्य याविषयी संबोधन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मा.आमदार जितेश अंतापूरकर, तर अतिथी म्हणून श्री मोगलाजी शिरशेटवार, श्री लक्ष्मीकांत पदमवार, श्री अविनाश नीलमवार,श्री सुनील यशमवार, श्री महेश पाटील, श्री संजय जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माच्छरे, पो उपनिरीक्षक श्री श्रीकांत मोरे साहेब, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री मारुतीराव हिंगोले तालुका अध्यक्ष भा. माजी सै.स. देगलूर, श्री प्रवीण देवडे, मडल अधिकारी श्री हयुन पठाण, श्री श्याम कस्तुरे, श्री ज्ञानेश्वर पा डूमने, श्री हरिभाऊ करांडे हे होते. सूत्रसंचालन इरशाद पटेल यांनी केले तर आभार प्रकटन श्री सुभेदार राजू निलमवार यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापण आणि नियोजन हे सुभेदार संतोष केंचे (सेवानिवृत), सुभेदार महेश देवापूरकर (सेवानिवृत), सुभेदार निलमवार राजु, श्री संतोष मंधरणे, श्री इरशाद पटेल यानी केले आणि श्री रुपेश बत्तलवाड, दत्तात्रये मलगिरवार , श्री नागेश गोरलावर, श्री शिवाजी म्हेत्रे, यशवंत बरडवार, बालाजी हिरेवाड, अविनाश आनमुलवार, अनिकेत आनमुलवार इत्यादी चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंह चा वाटा होता.