दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवि सरकार इ़ंगळी
लेखक एम. एस. जाधव तथा कवी बाबा जाधव यांनी संपादित केलेल्या ‘हरवलेले बालपण ‘ या प्रातिनिधिक बालकविता संग्रहाला हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय संत नामदेव संपादन साहित्य पुरस्कार जाहिर झाल्याचे संयोजक व मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. श्रीराम कराळे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. या पुरस्काराचे वितरण हे येत्या 22 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे.
चिरंजीव अथर्व याच्या स्मृतिप्रितर्थ महाराष्ट्रातील ज्येष्ठ तसेच नवकवी यांनी लिहिलेल्या 115 बालकवितांचा प्रातिनिधीक कवितासंग्रह श्री. एम. एस. जाधव यांनी अभ्यासपूर्ण आशयासह संपादित केला आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीबद्दल सदर पुरस्काराने जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यापूर्वी ‘प्रश्न तेच पाऊलवाटा नव्या’ या वैचारिक पुस्तकाला व ‘भूक’ या काव्यसंग्रहाला अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीत बालकांच्यासाठी प्रस्तूतचे पुस्तक प्रकाशित केल्या बद्दल श्री. एम् . एस् . जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्री. जाधव यांचे आप्तेष्ट व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.