दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या आवडाभरापासून आमदार बच्चुभाऊ कडू आणि रवी राणा यांच्यातील खोके आणि किराणा वाटपावरून शिगेला गेलेला वाद काही प्रमाणात थांबला.आज बच्चुभाऊ कडू यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अमरावती येथील नेहरू मैदानवर कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष,अपंग पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्यात बच्चुभाऊंनी रवी राणा यांची पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय पण यापुढे अशी चूक झाल्यास माफ करणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.
रवी राणा यांनी झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त केली म्हणून नाहीतर उगाचच हातपाय हलवावे लागले असते.त्यांना आपली चूक लक्षात आली.तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ आम्हाला आमची ऊर्जा अशा कामात वाया घालवायची नाही.त्यामुळे हा विषय आता इथे संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कर्मी लागावा यासाठी आम्ही सदैव झटत राहू असे यावेळी बच्चुभाऊ म्हणाले तसेच बच्चुभाऊंनी यावेळी प्रहार संघटनेने आजवर रुग्ण,गोरगरीब जनता,अपंग व्यक्ती,शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती सुद्धा दिली.
भविष्यात प्रहारचे १० आमदार स्टेजवर असतील
बच्चुभाऊ कडू यांनी पुढील काळात राज्यात प्रहारचे १० आमदार असतील असा विश्वास व्यक्त केला.प्रहारची ही सुरवात आहे.आज स्टेजवर दोन आमदार आहेत पण येत्या काळात १० आमदार स्टेजवर असतील.रुग्ण,गोरगरीब जनता,अपंग व्यक्ती,शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही म्हटलं तर सरकार बसलं पाहिजे आणि आम्ही म्हटलं तर सरकार उठल पाहिजे.अश्याच पद्धतीने गोरगरीब जनता,अपंग व्यक्ती,शेतकऱ्यांसाठी काम करून घेऊ.प्रहारच नात जातीशी नाही आपल नात दुःखीतांसोबत जोडलं गेलं पाहिजे आणि यावेळी आम्ही आमचा अपमान सहन केला पण सामान्य माणसांचा अपमान सहन केला जाणार नाही असे बच्चुभाऊ स्पष्ट यावेळी म्हणाले.
पुढचा खासदार प्रहारचा-आ. राजकुमार पटेल
अमरावतीत लोकसभेच्या निवडणुकीत जो कोणी खासदार निवडून येतो तो मेळघाट आणि अचलपूरच्या भरवश्यावर निवडून येतो.आपल्याला आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहारचा खासदार निवडून आणताचा आहे.तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही ताकदीने लढणार असून अध्यक्षस्थानी प्रहरचाच असणार असे आ.राजकुमार पटेल म्हणाले.मतदार संघातील कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्तेसोबत आहोत म्हणून सरकार मध्ये आहोत.असे आ.राजकुमार पटेल म्हणाले.