दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
अकोला दि. भारतातील सर्व बहुजनांनी आणि आंबेडकरवादी नेत्यांनी आता विदेशी आक्रमणकारी आर्य ब्राह्मणांच्या ताब्यात असलेली बुद्ध विहारे मुक्त करण्यासाठी मोठे जनआंदोलन केले पाहिजे म्हणजे हजारो वर्षापासून ब्राह्मणांनी केलेली लबाडी हि सर्वच जनतेच्या समोर येईल असे मत बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले.
66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चांदूर खडकी जिल्हा अकोला येथे नुकताच झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शन म्हणून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे बोलत होते
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर नाशिकचे काळाराम मंदिर बारा ज्योतिर्लिंग मंदिरे पूरीचे जगन्नाथ मंदिर अशी अनेक शेकडो मंदिरे बुद्ध विहार होती आज परिस्थिती पुराव्यानिशी सिद्ध होत आहे की भारतात सम्राट अशोक राजाने बांधलेल्या (८४.०००) हजार बौद्ध विहाराचा शोध घेतला पाहिजे अनेक राज्यांमध्ये अनेक जाती धर्मांच्या नागरिकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि स्वीकारत आहे तेव्हा संपूर्ण भारत बौद्धमय होत आहे आणि होत राहील असे फक्त म्हणून सांगून उपयोग होणार नाही त्यासाठी भारतातील सर्व बहुजनांनी आणि आंबेडकरवादी नेत्यांनी व विचारवंतांनी सामूहिक पद्धतीने एकत्र येऊन जन आंदोलन करावे असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
विदेशी आर्य ब्राह्मण आक्रमणकारी आहेत हे जगाला माहिती होऊ देणे गरजेचे आहे या आर्य ब्राह्मणांनी भारतातील बहुजनांना अनेक जातीत विभाजन करून ते पुन्हा एकत्र येऊच नये म्हणून बहुजनांचा मूळ बुद्ध धम्म लपवून ठेवून त्यांच्यावर हिंदूचा शिक्का मारून ठेवला त्यांच्यात पुन्हा उच्च आणि निश्चय असे भेदभाव निर्माण करून ते एकत्र येऊन आक्रमणकारी ब्राह्मणांच्या सत्तेला कधीही शह देऊ नये म्हणून याचा पुरेपूर बंदोबस्त करून ठेवला .याचीच कडू फळे आजचा हा बहुजन समाज गेली अनेक हजारो वर्ष भोगत आहे आता शेकडो आणि हजारो वर्षानंतर बहुजनांना या विदेशी आर्य आक्रमणकारी ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एक संधी मिळाली आहे त्यासाठी सर्व बहुजनांनी व मूलनिवासी यांनी आपला गमावलेला आत्मसन्मान प्रतिष्ठा मानसन्मान परत मिळवण्यासाठी आपसातील सर्व भेदभावाची राख रांगोळी करून सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे असे आव्हानही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
जोशाबा रुक्मिणीनंद बहुउद्देशीय संस्था आणि अशोक क्रीडा मंडळ यांच्यासह अनेक संस्थांच्या वतीने 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांचा श्रीफळ शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पंजाब वर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक आणि बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष विलास मोरे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी न्याय विभाग अकोला जिल्हा उपाध्यक्ष के सी बागडे परिपाचे जिल्हाध्यक्ष नागेश क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सभापती लख्खुआप्पा लोखंडे भीम शाहीर देविदास सावदेकर आणि चांदुर खडकी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष विलास मोरे यांनी कळविले आहे.