दैनिक चालू वाताॅ.
शहादा ग्रामीण प्रतिनिधी
पूनम पवार
तोरणमाळ येथील मंगेश अशोक नाईक वय २३ वर्षे हा तरुण गुरे ढोरे चारण्यासाठी गेला असताना झाडावरून खाली पडला, डोक्यावर व नाकावर गंभीर दुखापत झाली…. आई नाही दारूच्या आहारी गेलेला बाप. एका असहाय्य युवकावर अस्मानी संकट उभे राहिले…. अशावेळी सामजिक कार्यकर्ता जीवनदादा रावताळे धावून आले. तोरणमाळ येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथमतः दाखविले. रुग्णाची प्रकृती खालावल्याने neurologist डॉक्टरांची नितांत आवश्यकता होती, पैशाअभावी शिर्डी साईबाबा संस्थान हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. सदर हॉस्पिटल कोविड सेंटर असल्याने जवळच असणाऱ्या आत्मा मालिक हॉस्पिटल आणि साई बाबा मेडिकल हब येथे घेऊन गेले.. जीवनदादा सातत्याने माझ्या संपर्कात होते.
०३ नोव्हेंबर रोजी admit झालेल्या मंगेशला ऑपरेशन साठी रेशन कार्डची मांगणी केली. मान्य आहे कागदपत्रांची आवश्यकता असते अहवाल सादर करण्यासाठी. परंतु रुग्णाचा जीव महत्त्वाचा की रुग्णाच्या जीवावर तयार होणारा अहवाल? दीपावलीच्या सुट्ट्या आल्याने रेशन कार्ड मध्ये नाव ऑनलाईन करता आले नाही. ०३ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर तब्बल ०७ दिवस कागदपत्रे अभावी ऑपरेशन झाले नाही. या सात दिवसांत जर त्या रुग्णाचे काही बरे वाईट झाले असते तर त्यांस जबाबदार कोण?ही जबाबदारी आत्मा मालिक हॉस्पिटल्सने उचलली असती का? नाही अजिबात नाही. त्यांना रुग्णाच्या जीवापेक्षा रेशनकार्डभोवती लटकलेला मालिदा लाटण्यात रस दिसतो.
माणुसकी शून्य असणाऱ्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा पैशांसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पेमेंट देवून पेशंटला लवकर घेऊन जा, असे सारखे सांगण्यात आले.२१०००/- बिल काढले असताना. जेमतेम १००००/- देवून पेशंटला धुळे येथे हिरे मेडिकल कॉलेज च्या दिशेने निघाले… खरं तर रुग्णाच्या बाह्यपरिस्थितीवरुनच त्याच्या आर्थिक परिस्थितीचं अवलोकन होतं.मग अश्या नाजुक परिस्थितीत जिथे रुग्ण जीवन आणि मृत्युशी एकाकी झुंज देत असतो तिथं कागदपत्रांच्या औपचारिक पुर्ततेचा हट्ट. म्हणजे रुग्णाला मृत्युच्या दाढेत ढकलण्यासारखेच झाले. कागदी घोड्यांच्या औपचारिक पुर्ततेसाठी आयुष्य पडले आहे. सिर सलामत तो पगडी पचास. आज सातपुड्यातील असंख्य बांधवांना कागदपत्राअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. शिर्डीसारख्या पावनभुमीत ज्याठिकाणी साईबाबांनी निस्वार्थ आणि निरपेक्षपणे जनसामान्यांची सेवा केली. आज त्याच पवित्रभुमीत आत्मा मालिक हॉस्पिटल आणि साई बाबा मेडिकल हब सारखे माणुसकी शून्य हॉस्पिटल्स फक्त योजनांच्या नावाखाली खोऱ्याने पैसे कमावित आहेत. ही अतिशय लज्जास्पद बाब आहे.अपघात झाल्यावर प्रथम उपचार झाला पाहिजे.
कागपत्रांची मागणी करू नये, एवढेच आपल्या माध्यमातून मागणी आहे.
जय महाराष्ट्र. – श्री विजय छगन ब्राम्हणे शिवसेना अक्कलकुवा धडगाव विधानसभा संघटक