जनता दरबाराच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- आ. भिमराव केराम
अजय चव्हाण दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वानोळा सर्कल.
किनवट माहूर येथील जनतेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून जनता दरबाराच्या माध्यमातून समस्या सोडविण्या चा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आ. भिमराव केराम यांनी दिली.
वानोळा जि. प. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात वानोळा, पानोळा, पाचुंदा, मांडवा, कुपटी, मेंढकी, मुंगशी,रामपूर या गावातील नागरिक उप स्थित होते, यावेळी नागरिकांनी विविध योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योज ना,
निराधार, घरकुल व अशा अनेक तक्रारी मांडल्या.
आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द असुन कोरोना सारख्या महा भयंकर बिमारिमुळे मी तुम्हाला भेवू शकलो, माझे दोन वर्षें वाया गेली अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
तसेच श्री रेणुका गॅस एजन्सी च्या वतीने महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) सुमित राठोड,भाजपा युवा नेते रमन जयभाये, किनवट चे मा.नगराध्यक्ष अनिल तिरमनवार, माहूर शहर अध्यक्ष गोपू महामूने, वानोळा गावचे सरपंच रविकुमार मेंडके, मा. तालुकाध्यक्ष ज्योतीराम राठोड, माहूर तालुका अध्यक्ष दिनेश येवूतकर, पंढरीनाथ ठाकरे, दिनेश येवूतकर, शंकर आडे, अनिल तोडसाम ई. उपस्थित होते.
प्रशासकिय अधिकारी म्हणून माहूर तहसीलदार राजेश गिड्डे, गट विकास अधिकारी आरबड वार, महावितरण कनिष्ठ अभियंता रापतवार, वानोळा वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज नरवाडे ई.उपस्थित होते.
पत्रकार संघाचे नितेश बनसोडे, पंडित धुप्पे, कैलाश चव्हाण, अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी परिसरातील सर्व नागरिक, निराधार व्यक्ती, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार पंडित धुप्पे यांनी मानले.