अजय चव्हाण दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वानोळा सर्कल मधील बहुतांश शेतकरी यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून सदरील लाभार्थ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली असून सुद्धा अद्यापही रक्कम मिळालेली नाही.
शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून आपल्या शेतात पेरणी करून पीक उगवतो, निसर्गाच्या कोपापायी सबंधित पिकाचे नुकसान झाले असून पिकांना कोंब फुटतात, उत्पन्न कमी झाले आहे, तसेच पिकांना हमी भाव दिल्या जात नाही.
अश्या अनेक अडी अडचणी ला सामोरे जावे लागते अशी खंत वानोळा सर्कल मधील शेतकरी अरुण राठोड यांनी व्यक्त केली.
शेतकरी यांना योग्य वेळी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.