दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
महाराष्ट्रातल्या जत, अक्कलकोट तालुक्यांमधल्या गावांवरच्या
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचा अजित पवारांकडून निषेध
महाराष्ट्राच्या जत व अक्कलकोटमधल्या गावांवर दावा
करणारी वक्तव्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवावीत
जत व अक्कलकोट मधल्या गावांवर केलेला दावा
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘खयाली पुलाव’ ठरेल
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह
सीमाभागातल्या 814 मराठी गावांचा खरा मुद्दा आहे
“महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील गावांवर दावा सांगणारं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वक्तव्य निंदनीय असून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. धिक्कार करतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे असून त्यांनी अशी वक्तव्ये तात्काळ थांबवावीत. केंद्र सरकारनं याप्रकरणात लक्ष घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवरावं. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्ये महाराष्ट्र सहन करणार नाही. जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवरचा दावा त्यांच्यासाठी ‘खयाली पुलाव’ ठरेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातली 814 मराठीभाषक गावं महाराष्ट्रात येणं हा खरा मुद्दा आहे. ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीनं लढेल.”
– अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा.