दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : आशिष शेलार हे मुंबई पत्रकार परिषदेतून ते पत्रकाराशी संवाद साधत होते. महाराष्ट्र राज्य हळुृहळु अराजकतेकडे निघालं आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. राज्यात दहशतवादी कारवाया सुरू असताना पोलीस आणि एटीएस शांत आहेत.अनिल देशमुख अद्यापही समोर येत नाहीत. महाराष्ट्र कायद्याचं राज्य राहिलंय का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.
. ते पुढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांना विनाकारण अटक करण्यात आली. त्यांना स्थानबद्ध कशासाठी केलं? तक्रार दाखल करायला गेलेल्या करुणा शर्मांना खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली, असंही आशिष शेलार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.