दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेलं हातातोंडाशी आलेल पीक खळ्यावर असतानाच गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास जवळपास दोन तास बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान होऊन ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.अगोदरच शेतकरी अडचणीत असताना आज झालेल्या पावसाने अजून बळीराजाची चिंता वाढली.भात,नाचणी,उडीद,अश्या अनेक प्रकारची पिके पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे.अचानक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली.या जोरदार झालेल्या पावसाने काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला.