दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: लागूनच असलेल्या पेठ अहमदपूर येथील बुद्ध विहारात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाची सभा संपन्न झाली या सभेला ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पिछाडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी श्रीकांत होवाल होते या सभेमध्ये चौधरी विकास पटेल यांनी ओबीसीची जात निहाय सामाजिक,आर्थिक जनगणना, क्रिमिलेयर बंद झालं पाहिजे,३१४ ओबीसी विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत पास होवून त्यांची नियुक्ती थांबवून केंद्र सरकारने केलेली धोकेबाजी, मंडल आयोगाच्या उर्वरित शिफारशी लागू करण्यात याव्या, ईव्हीएम घोटाळा, ओबीसी वर्गावर होत असलेल्या अन्यायावर विस्तृत प्रकाश
टाकत आदी अत्यंत ज्वलंत मुद्दे उपस्थित केले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विजू सव्वालाखे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून सुनील निंभोरकर नितीन गंद्रे, अंकुश भोंडे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष सागर मेंढे, नौशाद शहा, प्रकाश श्रीरामे, निलेश पाटील, मदर शहा नासिर खान, महादेव धुर्वे यांनी परिश्रम घेतले