दै चालु वार्ता वृत्तसेवा /
नवी दिल्ली : देशातील करोना विषाणूची ताकद हळूहळू कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू १.१७ इतकी होती. तर ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ही आर-व्हॅल्यू १.११ वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही ०.८६ होती. खरंतर, महाराष्ट्र आणि केरळमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे देशाची आर-व्हॅल्यू वाढली होती. मात्र, सध्या या दोन्ही राज्यांमध्ये करोनाची प्रकरणं कमी प्रमाणात नोंदवली जात आहेत. करोना व्हायरसचं भारतातील आर मूल्य अर्थात आर व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे आर व्हॅल्यू हे एक परिमाण आहे. याद्वारे देशात करोना व्हायरसचा संसर्ग किती वेगाने पसरत आहे हे मोजलं जातं. संशोधकांच्या मते, आर-व्हॅल्यू करोना विषाणू किती वेगाने पसरतो हे दर्शवते. दिलासादायक बाब अशी की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील आर व्हॅल्यू ०.९२ वर आली आहे.तसेंच
देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू १ पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही १ पेक्षा कमी आहे. मात्र, यापूर्वी याच दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची प्रकरणं नोंदवली गेली होती. तर, करोनाच्या सर्वात जास्त सक्रिय प्रकरणांच्या नोंदीदेखील या दोन राज्यांमध्ये झाल्या होत्या.