दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी पुरीगोसावी
सैराटच्या पुनरवृत्तीने महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. दोनच दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये खानापूरच्या युवकाचा प्रेम संबंधातून मित्राच्या मदतीने अखेर त्याचा सैराट केला. आणि असाच प्रकार नंदुरबारमध्ये घडला आहे. बहिणीला पळवून नेत प्रेम विवाह केल्यांच्या रागातून मेव्हण्यांने भावोजीची हत्या केली आहे .ही घटना नंदुरबार शहरांतील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरांमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारांस घडली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली घटनेनंतर परिसरांत काही काळ तणावचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेनंतर आरोपी जयेश गंगाराम सोनवणे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली. आरोपी जयेश सोनवणे यांनी पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये माझ्या बहिणीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता.पतीसोबत मच्छी बाजार चौक या परिसरांमध्ये वास्तव्यांस होती. बहिणीने पळून जावून लग्न केल्याचा याचा राग मात्र भावाच्या मनात चांगलाच होता. याच रागाच्या भरातून अखेर त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारदार शास्त्रांने भासकून हत्या केली. आरोपी जयेश सोनवणे हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.