दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारत सरकार सौर उर्जा प्रकल्प विषयी विविध योजना राबविल्या आहेत. पण यांच्या उलट चित्र देगलूर तालुक्यातील अनेक भागातील गावांत पहावयास मिळत आहे.
देगलूर तालुक्यातील अनेक गावांत पारंपरिक स्रोतापासून मिळणाऱ्या विजेचा वापर कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या सौरऊर्जा पथदिव्यांचे अवस्थांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तर गावांत उभे केलेले खांब व त्यावर बसवलेल्या सौरऊर्जा दिव्य पाहावयास मिळतात. मात्र दिव्याचा प्रकाश मावळला परंतु (नादुरुस्त ) खराब झालेल्या दिव्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याने सौरऊर्जा दिव्याचे वैभव संपले काय. ?
असं तेथील स्थानिक मध्ये चर्चा सुरू आहेतदेगलूर तालुक्यातील शेळगाव, शेवाळा, शेखापुर, तमलूर, मेदनकर, सावरगाव, सांगवी, नरगल, नंदुर, आलूर, मलखापुर, शहापूर, सह अन्य गावातील ग्रामीण भागात सौरऊर्जा पथदिव्ये बसविण्याकरिता ग्रामपंचायतीने विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. पण सदर निधी पाण्यात गेल्याचे चित्र संध्या अनेक गावागावांत पाहायला मिळत आहे. बहुतांश गावात तर सौरऊर्जा पथदिव्ये बंद अवस्थेत आढळून येतात तर
शेळगाव गावात तर सौरऊर्जा पथदिव्ये रात्रीच्या वेळी चालू होण्यासाठी लागणारी पोलवरील बॅटरीच चोरीला गेलेली अनेक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे, पण देगलूर तालुक्यातील शहापूर सर्कल गणातील अन्य गावातील ग्रामपंचायत अंतर्गत दिवाबत्ती वित आयोगातील निधीतून सौरऊर्जा पथदिव्ये अनेक गावांमध्ये लावण्यात आले असून साधारणता लाखो रुपये खर्च करण्यात आले, तरी सौरऊर्जा पथदिव्यांचादेखभाल व दुरुस्तीच्या बाबतीत तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाची हलगर्जीपणा पाहायला मिळतं आहे, तरी नादुरुस्त असलेले सौरऊर्जा दिव्ये बद्दलनेही ग्रामपंचायतीला कठीण झाले आहे. तर काही ठिकाणी सौरऊर्जेचे बॅटऱ्या गावांतील काही पुढाऱ्यांच्या घरी ट्रॅक्टरला बसवलेल्या तर काही ठिकाणी प्रसपर विक्री करण्यात आलं आहे असं तेथील स्थानिक दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे, तर खाजगी कामासाठी वापरले जात आहेत. तरी पण देगलूर तालुक्यातील अनेक भागातील ग्रामस्थ कडून मागणी केली जात आहे, ज्या सौरऊर्जाचे पोल वरून अज्ञात व्यक्तींनी बँटर्या चोरलेल्या निदर्शनास आले असुन या कडे संबंधित प्रशासन विभाग लक्ष देणार काय. ?
याकडे अनेक भागातील जनतेच सर्वाचे लक्ष वेधले असुन या कडे संबंधित अधिकारी व प्रशासन जाणिव पूर्व लक्ष घालत नाहीत असे अनेक गावांमध्ये स्थानिक पातळीवर बोलले जात आहे, तसेच ज्याव्यक्तींनी चोरलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, असे मागणी तेथील स्थानिक ग्रामस्थ कडून होत आहे.