दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- दि.२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघाच्या व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यांत एकाही वृत्तपत्राने शिक्षकांच्या हक्काबाबतची चर्चा न करता जणू हे सर्व मतदार संघ नुसत्या नावापुरतेच शिक्षक व पदवीधर विभागासाठी असल्याचे विसरुन राजकारण आणले आहे. यांचाही निवडणुकीबद्दल राजकीय पक्षांचाच बोलबाला अथवा चुकीचा पाढा वाचून बिचाऱ्या
शिक्षकांसाठी व पदवीधरांसाठीच हे मतदार संघ असल्याने त्यांना बाजूला सारुन इथे भाजपच्या पराभवाने तिथे राष्ट्रवादीचा विजय, तर कुठे त्या-त्या पक्षपुढाऱ्यांच्या व नेत्यांचाच चुका दाखवून वर्णने जाहीर केली आहेत. याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहिले नाही. आता निवडून आलेले व पराभूत झालेल उमेदवार राजकीय पक्षांचेच असल्याचा चुकीचा समज जनतेत पसरविला आहे. वस्तुत हे दोन्ही मतदार शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघाचे आहेत दिसते, ही बाब सर्वच पत्रकार विसरल्याचे दिसते. उमेदवार जे निवडून आले त्यांत आता ही निवडून आणणाऱ्या पक्षांचेच असल्याचा खोटा भास निर्माण केला आहे.
राजकीय पक्षांसाठी सार्वत्रिक निवडणुका असतांना त्यांनी व आम्ही या बिचाऱ्या शिक्षक व पदवीधरांच्या कल्याणासाठी असलेल्या जागावर आपला पक्षाने ताबा का करावा ? याबद्दल कुणीच तक्रार करीत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे हे वेगळे व स्वतंत्र मतदार संघ कशासाठी शासनाने तयार केले ? याबद्दल शिक्षक संघटना व पदविधरांच्या संघटनांनी जाब विचारला पाहिजे. परंतू त्याबद्दल कोणीच कांही बोलत नाही. याचेही आश्चर्य वाटते या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार शिक्षक अथवा शुध्द पदवीधर म्हणून राहिलेले नाहीत. चार चार वेळा निवडून आल्याने त्यांनी संघटना सोडून पक्षाचीच साथ धरली व राजकारण सुरु केले आहे. हा प्रकार घटना व कायद्या विरोधी नव्हे काय ? याचा गंभीर पणे विचार करण्याची आहे. जनता जनार्दन, मतदार व शिक्षक, पदवीधारांनी करणेची सक्त गरज निर्माण झाली आहे. हे मतदार संघ ४/५ जिल्हयाचा एक मतदार संघ करून तयार केलेले आहेत. तेंव्हा सर्व विभागातील शिक्षक व पदवीधरांना प्रत्येक वेळी विभाग बदलून उमेदवारी देणे गरजेचे नाही काय ? एकाच उमेदवाराला ३ ते ४ टर्म देऊन इतर विभाग व जिल्हयांवर अन्याय होत नाही काय ? याचा तरी विचार व्हावा ? यापुढे तरी ही गोम समजून पक्षांच्या व राजकारणाच्या नादाला लागून आपला हक्क का ठामपणे मांडू नये ?असे विचार माजी आमदार व सभापती गुरूनाथ कुरुडे यांनी मांडले आहेत.