दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आला असून मंगळवार, 14 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे.
शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका यादीत असून त्यात सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.
खरी शिवसेना कुणाची यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालाचीही प्रतीक्षा सुरू असून राज्यातील भाजप शिंदे सरकारवर कायदेशीर आहे किंवा नाही, यावर देखील यानिमित्त शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. घटनापिठापुढे या प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. या घटनापिठात न्यायमुर्ती शहा, न्यायमुर्ती मुरारी, न्यायमुर्ती हिमा कोहली आणि न्यायमुर्ती नार्सिंमा यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपसोबत स्थापन केलेले सरकर हे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला जातो. यादरम्यान तसेच ठाकरे आणि शिंदे गटात शिवेसना कोणाची यावरून देखील वाद सुरू आहे.
दोन्ही गटांकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातो. शिंदे-भाजप सरकार घटनाबाह्य असल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.