दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- हे कोणाला सांगण्याची आवश्यकता असेल असे वाटत नाही, पण आपण काही विसरत आहोत का?यांची आठवण करणे जरा आवश्यक वाटत आहे का?
महाराजांना एक दिवस आठवण केली, महाराजांचा फोटो असलेला झेंडा गाडी (बाईकवर ) लावला,
गाडीचे सायलेंन्सर काढून फट फट करत, दारू पिऊन चिरकत, ओरडत, गावभर फिरले,रात्री झेंडा कोठेतरी पडला झाली का जयंती, स्वराज्य एका दिवसात भेटले नाही, कित्येकांनी आहुत्या दिल्या, शेकडो मावळ्यांनी रक्तवाहिले स्वराज्यासाठी, महाराजांनी किती दु:ख भोगले किती कष्ट केले, शिव चरित्र वाचा, जयंती करावी,पण चरित्र सांभाळून , मर्यादा ठेऊन,पारंपारिक, धार्मिक, समाजपयोगी कार्य करुन,शेतकरी राजा, कष्टकरी,दिन दुबळ्यांना मदतीचा हात देऊन,त्यांच्या हाताला स्वाभिमानाचा रोजगार देऊन, निराधार अनाथांना आधार देऊन, त्यांचे कष्ट दुर करुन, हेच तर केले महाराजांनी,आपल्या प्रजेची सेवा केली,ज्यांनी गुलाम बनवले त्यांचा अंत केला, गद्दारांना शिक्षा,महिलांचा सन्मान, शेतकरी राजांची सेवा, असे महान आपले राजे,यांची जयंती झेंडे लावुन फट फट करत फिरलो, धिंगा मस्ती गोंधळ मग काय आदर्श घ्यावा, पुढच्या पिढीने शेवटी यांचे पण टाईम पास व फँशन करु नका, शिवचरित्र वाचा ,त्यांचे अनुकूल असे पालन करा,नवी पिढी घडवण्यांचे कार्य करा,
देव देश धर्माची शिकवण स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा,समाजसेवक बना,पण भष्ट्राचार, अत्याचार, दुराचार या पासून दुर राहून कार्य करा…
उद्याचे महान भारतीय नागरिक बना..
जिथे अन्याय दिसेल तिथे संघर्ष करा, आणि शिवचरित्र जीवनात उतरवा, जयंती हा उत्सव आहे, याचे विद्रुपीकरण होणार नाही हा संकल्प आपण करू
आज नवीन संकल्प केला सुरुवात पण आजच केली,महाराजांची किर्ती यश ,महाराजांचा गनिमीकावा, महाराजांचे शौर्य, जिवन गाथा वाचण्याच्या संकल्पाची सुरुवात केली…
मी पण केला आहे, संकल्प तुम्ही पण करा माझ्यासाठी नाही, मी म्हणतो म्हणून नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी केलेल्या बलिदानासाठी..