दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नांदेड :- मातंग सामाजासह ५९ तत्सम जातीतील लाभ वंचित घटकांमधील शेवटच्या माणसाचे हक्क,अधिकार प्रवाहात आणुन त्याना हक्क मिळवून देण्यासाठी
मुंबई येथील येत्या दिनांक २२ फेब्रुवारीच्या रोजी होणा-या जवाब दो आंदोलनात महाराष्ट्रातील लोकस्वराज्य आंदोलनाच्या महाराष्ट्र राज्यातील तमाम कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावेअसे,आवाहन प्रा.रामचंद्र भरांडे सर यांनी नांदेड येथील लोकस्वराज्यच्या नियोजन व आढावा,चिंतन बैठकीत केले आहे.जवाब दो आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी नांदेड येथील व्हिआयपी शासकीय विश्रामगृहात दिनांक१७फेब्रुवारी२०२३रोजी दुपारी दोन वाजता लोकस्वराज्य आंदोलनाचा कार्यकर्ता,पदाधिकारी आढावा व विभागीय चिंतन बैठक पार पडली.प्रथम आद्य क्रांतीवीर क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे व राष्ट्रीय संत रविदास महाराज,सद्गुरु संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करुन ही बैठक सुरू करण्यातआली.या वेळेस प्रा.रामचंद्र भरांडे सर,व्हि.जी.डोईवाड,रावसाहेब दादा पवार,एन.जी.पोतरे,एन.डी शेळके,एम.जे.पिंगळे,पंडितराव वाघमारे,श्रीमती सुभद्रा मोरे,शेषराव रोडे,प्राध्यापक इरवंत सूर्यकार,बाळासाहेब टिकेकर डौरकर,माणिक कांबळे,धोंडोपंत बनसोडे,बि.एम गोणारकर,कमलाकर महाराज,संतोष तेलंग,अर्जुन गायकवाड,अंकुश गायकवाड,साई जळपतराव,नागेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.पुढे बोलताना भरांडे सर म्हणाले की,अनुसुचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरण करुन शेवटच्या लाभ वंचित माणसाला न्याय मिळावा,यासाठी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना ही, मुंबई येथील जवाब दो आंदोलनात सहभाग नोंदवत सरकारचा जवाब घेतल्या शिवाय आम्ही मुंबई आझाद मैदान सोडणार नाही.असे ही भरांडे सर म्हणाले.नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसह मातंग समाजासह तत्सम जातीने या आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन प्राध्यापक भरांडे सर यानी केले आहे.ही लढाई सामाजिक न्यायासाठी आहे.त्याच दृष्टिकोनातुन त्यांकडे पाहिले पाहीजे.मुबई येथील जवाब दो महामोर्चातुन समाजातील प्रश्न,हक्क, अधिकार आणि चळवळ पुढे गेली पाहीजे.तरच हा महामोर्चा न्यायाच्यां दिशेने जाईल.याची खबरदारी सर्वानी घेतली पाहिजे.त्याचबरोबर एसी प्रवर्गातील ५९ जातींना संरक्षण आणि हक्क मिळवून देणे गरजेचे सुद्धा आहे. असे ही ते म्हणाले.बार्टी पुणे संस्थेतील भ्रष्ट व गैरकारभाराची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत तात्काळ करावी ही मागणी घेऊन मा.श्री अँड दत्तराज गायकवाड प्रदेशाध्यक्ष,युवक आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी गेल्या पाच दिवसा पासून बार्टी पुणे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलेआहे.त्याविषयी सुद्धा महासंचालकांनी व राज्य सरकारने तात्काळ चौकशी लावून हे बेमुदत धरणे आंदोलन सोडवण्यासाठी आपणाला प्रयत्न करावे लागेल,अशी सुद्धा गंभीर चर्चा यावेळी करण्यात आली.तसेचं राज्य सरकारला याविषयी जवाब मागण्यांसाठी आपण सर्वांनी ताकदीने लढावं लागेल,असे शेवटी प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर म्हणाले.
या बैठकीला जेष्ठ नेते संभाजी वाघमारे,प्रकाश ननुरे,प्रकाश कांबळे, कैलास सुर्यवंशी,जकोजी चरके, पि.जी.केदारे,आकाश टोमके,सुनिल जाधव,डी.एन.मोरे,काॅ.शाम सरोदे, गोपाळ वाघमारे,ज्ञानेश्वर गाडेकर, नागेश सरोदे,आनंदराव जळपते, गोविंद जोंधळे,जी.आर.गोणारकर, भगवान बाभळे,दासराव वाघमारे, गंगाधर गायकवाड दिघीकर,सुनिल गाडेकर,विकास गाडगेराव, संजय गायकवाड,शिवाजी बर्दापुरे, दशरथ आंबेकर,इरेगाव प्रितम गोरेकर,मारोती दुमटकर,आनंदाराव काराळकर,मोहन कांबळे आदीची आवर्जून उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन धोंडोपंत बनसोडे तर आभार प्रदर्शन संतोष तेलंग नांदेड यांनी केले.